जगाच्या इतिहासात कुणी केला नाही, असला फैसला बांगलादेशाने केला. बांगलादेशाचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ राज्यकर्ता मुघलांच्या परंपरेला जागला. त्याच्या राजवटीत बांगलादेशाने आपला “बापच” बदलून टाकला. मोहम्मद युनूस याच्या सरकारने बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांचा राष्ट्रपिता वंगबंधू हा दर्जा आणि किताब काढून घेतला. बांगलादेशी चलनी नोटांवरांवरून त्यांचा फोटो आधीच हटवला होता त्या पाठोपाठ यांचा बांगलादेशाच्या राष्ट्रपित्याच्या दर्जाही काढून घेतला.Bangladesh changed father of the nation like Mughal dynasty violent tradition
वास्तविक जगाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक क्रांत्या आणि वांत्या झाल्या. त्यावेळी आधीच्या राजवटीतल्या महापुरुषांचे पुतळे उखडले गेले. रशिया आणि अन्य कम्युनिस्ट देशांमधून लेनिन + स्टालिन यांचे पुतळे उखडले गेले. अनेक देशांमधून हुकूमशहांची हकालपट्टी करण्यात आली. पण कुठल्याच देशांनी कुठल्या राज्यकर्त्यांना आपल्या “बापाचा दर्जा” दिला नव्हता त्यामुळे तो काढून घेण्याचा प्रश्नही आला नव्हता.
पण बांगलादेशात जे घडले, ते मात्र सगळे मुघली परंपरेला अनुसरून झाले. कारण मुघलांच्या सत्तेमध्ये बापाला हटवून गादीवर जाऊन बसण्याची परंपरा बाबराच्या काळापासून औरंगजेबाच्या काळापर्यंत कायम होती. त्यात केवळ बापाला हटविले जायचे असे नाही, तर त्याची हत्या करून किंवा त्याला तुरुंगात घालून गादीवर बसले जायचे.
बांगलादेशातही नेमके हेच घडले. बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा शेख मुजिबूर रहमान यांनी पुढाकार घेऊन लढविला. भारतीय सैन्याने पाकिस्तान तोडल्यामुळे शेख मुजिबूर रहमान यांच्या लढ्याला निर्णायक बळ मिळाले. 1971 मध्ये ते स्वतंत्र बांगलादेशचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्रपिता बनले. भारताने सर्वात आधिमान्यता दिली. बांगलादेशाच्या उभारणीसाठी मदत केली. पण अवघ्या 4 वर्षांतच 1975 मध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन सुरू असताना 15 ऑगस्टच्या दिवशी बांगलादेशात लष्कराने बंड करून शेख मुजिबूर रहमान यांची त्यांच्या कुटुंबीयांसह हत्या केली. बांगलादेशाच्या गादीवर लष्करशहा जनरल झिया उर रहमान याला बसवले. त्याने सुमारे 7 वर्षे बांगलादेशावर राज्य केले. बांगलादेशी लष्कराने जनरल झिया और रहमान याच्या विरोधात बंड करून 30 मे 1981 रोजी त्याची हत्या केली.
– झिया उर रहमान नवा बाप
आता याच झिया उर रहमान याला बांगलादेशाने नवा राष्ट्रपिता घोषित केले आहे. झिया उर रहमान याची पत्नी बेगम खालिद झिया ही बांगलादेशाची दोनदा पंतप्रधान होती. तिची राजवट इस्लामी कट्टरवादी आणि भारत विरोधी होती. आपल्या राजवटीच्या काळात तिने प्रचंड भ्रष्टाचार केला. नंतरच्या शेख हसीना यांच्या राजवटीच्या काळात तिच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे खटले भरले गेले. या खटल्यांमधून वाचण्यासाठी ती बांगलादेशातून पळून लंडनला निघून गेली होती. पण बांगलादेशाला भारत विरोधी वळण लावण्यात तिचा फार मोठा हात होता. आता झिया उर रहमान याला बांगलादेशाचा नवा राष्ट्रपिता घोषित केल्याने मोहम्मद युनूस यांच्या राजवटीचा भारत विरोधी चेहरा आणखी गडद झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App