तेजस्वी यादव यांच्या टीकेलाही नितीश कुमारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये राजकीय गणिते पक्की झाली आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत एनडीएसोबत बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.After becoming the Chief Minister of Bihar for the ninth time Nitish Kumar targeted RJD
आरजेडीवर हल्लाबोल करताना नितीश कुमार म्हणाले, ‘तेजस्वी यादव कोणतेही काम करत नव्हते. सर्वांना एकत्र करून आम्ही पुढे जात होतो. नितीश यांनी तेजस्वीचा वेगवान काम करण्याचा दावा निराधार असल्याचे म्हटले आहे. कोणतेही काम वेगाने होत नसल्याचे ते म्हणाले.
वास्तविक, नितीश कुमार यांच्या शपथविधीपूर्वी तेजस्वी यादव यांचा मोठा दावा समोर आला होता. या वक्तव्यात तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थकलेले मुख्यमंत्री म्हटले होते. तेजस्वीच्या म्हणण्यानुसार मंत्री आमचा आणि विभाग आमचा असताना आम्ही श्रेय का घेऊ नये. ‘जे मुख्यमंत्री 2020 च्या निवडणुकीत म्हणायचे ते पैसे कुठून आणणार आणि देणार? नोकऱ्या देणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणायचे, ते आम्ही आठवडाभरात जाहीर केले.
इंडिया आघाडीबाबतच्या राजकीय चर्चेबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, या आघाडीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आघाडी पूर्णपणे मजबूत आहे. नितीश कुमार यांच्याबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही मोठ्या संयमाने आघाडी धर्म पाळला आहे. आता आम्ही आमची मते जनतेसमोर मांडणार आहोत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App