वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत चीन-पाकिस्तान सीमा आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत दोन्ही देशांच्या सीमेवर 3000 क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आहे. ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येतात.3000 missiles to be deployed on Pakistan-China border; 6800 crores project to be produced in the country
ही क्षेपणास्त्रे 6800 कोटी रुपयांच्या प्रकल्पात देशात बनवली जाणार आहेत. या प्रकल्पाला व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम (VSHORAD) असे नाव देण्यात आले आहे.
सध्या दोन कंपन्या VSHORAD बनवत आहेत
या योजनेनुसार लष्कर 500 लाँचर आणि सुमारे 3000 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा विचार करत आहे. ही देशात बनवली जातील. एवढेच नव्हे तर अन्य संबंधितांना सोबत घेऊन जुनी निविदा रद्द करण्याची शक्यता लष्कर विचारात घेत आहे. जुन्या इग्ला-1एम क्षेपणास्त्रांच्या बदल्यात होणारा विलंब पाहता रशियन इग्ला-एसची निवड करण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि हवाई दलातील सध्याच्या VSHORAD क्षेपणास्त्रांमध्ये इन्फ्रारेड (lR) होमिंग मार्गदर्शन प्रणाली आहे. Igla-1M VSHORAD क्षेपणास्त्र प्रणाली 1989 मध्ये समाविष्ट करण्यात आली. 2013 मध्ये ते डि-इंडक्शन करण्याची योजना होती.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, सध्या हैदराबादची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आणि पुण्याची खासगी कंपनी लेझर बीमने व्हीशोरॅड बनवत आहे. हे सीमेवर तैनात केले जातील, जेणेकरून शत्रूची ड्रोन, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट करता येतील.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, VSHORAD क्षेपणास्त्रांनी युक्रेन-रशिया युद्धात आपली क्षमता सिद्ध केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App