राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन भारताबाबत जी विधानं केलं, त्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन भारताबाबत जी विधानं केलं, त्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, राहुल गांधींनी संसदेत जाहीर माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने राहुल गांधी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. They did not become Gandhi by stealing their last names like you BJPs counterattack on Rahul Gandhi on Congress comment on Savarkar
काँग्रेसच्या सावरकर समझा क्या… ट्विटला सावरकर म्हणजे तिखट; भाजपचे प्रत्युत्तर!!
एवढच नाही तर काँग्रेसने उलट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करणारं ट्वीट करून, भाजपाल डिवचलं आहे. ज्याला भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. काँग्रेसने राहुल गांधी माफी मागणार नाहीत, असे सांगत सावरकर समझा क्या… अशा कॅप्शन ने राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केला आहे.
खर आहे, तुम्ही सावरकर होऊच शकत नाही! विर सावरकर हे तेजस्वी, तपस्वी, स्वातंत्रवीर आणि युगपुरुष होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर उपाधी देशातील जनतेने दिली आहे. तुमच्या सारख आडनाव चोरून 'गांधी' झाले नाहीत.@RahulGandhi https://t.co/TgXnF5TLBJ — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 20, 2023
खर आहे, तुम्ही सावरकर होऊच शकत नाही!
विर सावरकर हे तेजस्वी, तपस्वी, स्वातंत्रवीर आणि युगपुरुष होते.
सावरकरांना स्वातंत्र्यवीर उपाधी देशातील जनतेने दिली आहे. तुमच्या सारख आडनाव चोरून 'गांधी' झाले नाहीत.@RahulGandhi https://t.co/TgXnF5TLBJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 20, 2023
ज्यावर महाराष्ट्र भाजपाने सडतोड उत्तर देत म्हटले की, ”खरं आहे, तुम्ही सावरकर होऊच शकत नाही! वीर सावरकर हे तेजस्वी, तपस्वी, स्वातंत्र्यवीर आणि युगपुरुष होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर उपाधी देशातील जनतेने दिली आहे. तुमच्या सारखं आडनाव चोरून ‘गांधी’ झाले नाहीत.’’
राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी सोशलमीडियावर आपला टीआरपी घसरल्यानंतर नेहमीच सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्याचा आश्रय घेतला आहे. सावरकरांच्या या तथाकथित माफीनाम्यावर प्रख्यात इतिहासकारांनी अनेक स्पष्ट खुलासे करूनही राहुल गांधींनी त्याकडे हेतूतः दुर्लक्ष करत अनेकदा जुनीच टेप वाजवली आहे आणि राहुल गांधी ही टेप वाजवतात म्हणून काँग्रेसचे नेतेच मुद्दे रिपीट करत राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App