प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चात एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा “नॅनो” झाल्याची टीका केली आहे. The Great March failed; Why didn’t the media show the drone shot?
त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चा कसा फसला, याचे सविस्तर वर्णन केले. मराठी प्रसार माध्यमांनी महामोर्चाचे क्लोज अप शॉट दाखवले. कोणीही ड्रोन शॉट दाखवले नाहीत. कारण ड्रोन शॉट दाखवले असते तर मोर्चामध्ये गर्दी किती कमी आहे हे दिसले असते आणि महाविकास आघाडीचे नेते एक्स्पोज झाले असते, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावर आणि सीमा प्रश्नावर महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर घटक यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात प्रामुख्याने शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करून घेतले. मोर्चाच्या अखेरीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख भाषणे झाली. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हटविल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही आणि केंद्र सरकारने राज्यपालाविरुद्ध कारवाई केली तर केली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.
फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चा मध्ये झालेल्या टीकेला उत्तर देताना 3 पक्षांनी एकत्र येऊन केलेला हा महामोर्चा मुळातच नॅनो म्हणजे खूप छोटा झाल्याची टीका केली. खरं म्हणजे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर प्रचंड मोर्चा निघायला हवा होता. पण हा महामोर्चा गर्दी जमवण्यात विफल ठरला. त्यामुळे मराठी प्रसार माध्यमांनी देखील महामोर्चातले क्लोज अप शॉट दाखवले. कोणीही ड्रोन शॉट दाखवले नाहीत. कारण ड्रोन शॉट दाखवले असते तर महामोर्चा फसल्याचे दिसले असते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाची खिल्ली उडवली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आदर्श होते आणि यापुढेही राहतील. राज्यपालांसंदर्भात जो काही निर्णय करायचा आहे, तो केंद्र सरकार करेल, असा निर्वाळा फडणवीस यांनी दिला.
पण त्याच वेळी फडणवीसांनी सीमा प्रश्न मूळातच तयार करणारी काँग्रेस आहे आणि आज तेच त्या विषयावर मोर्चा काढत आहेत या विसंगतीवर बोट ठेवले. परंतु फडणवीस यांचा प्रामुख्याने भर मोर्चा गर्दी जमवण्यात अपयशी ठरण्यावर होता. त्यांनी माध्यमांच्या रिपोर्टिंग वर देखील बोट ठेवले. माध्यमे एरवी विविध मोर्च्यांचे ड्रोन शॉट दाखवतात. पण महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे मात्र माध्यमांनी क्लोज अप शॉट दाखवले. ड्रोन शॉट दाखवलेच नाहीत. त्यामुळे हा मोठा मोर्चा दिसला. परंतु ड्रोन शॉट दाखवले असते, तर मोर्चाचे वास्तव उघडे पडले असते, असा टोला त्यांनी महाविकास आघाडी आणि माध्यमांनाही लावला.
महामोर्चा आझाद मैदानात का नाही?
महाविकास आघाडीला सरकारने हा महामोर्चा आझाद मैदानात आणण्याची सूचना केली होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते धाडसच दाखवले नाही. कारण तेवढी गर्दीच ते महामोर्चात जमवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी छोट्या रस्त्यांवरून मोर्चा काढला. जिथे छोटी गर्दी ही मोठी दिसेल असा रस्ता पकडून तिथे सभा घेऊन भाषणे केली, असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिन्यात पडेल, असा दावा विरोधी पक्षनेता अजित पवारांनी केला. त्या दाव्याला प्रत्युत्तर येताना फडणवीस यांनी, त्यांच्या नाका खालून आम्ही त्यांचे सरकार घेऊन गेलो. आमचे वेगळे सरकार बनवले. ते कोणत्या तोंडाने आमचे सरकार पाडायच्या बाता करत आहेत? आमचे सरकार टिकणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढची निवडणूक लढवून पुन्हा सत्तेवर येणार, असा विश्वास व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App