विशेष प्रतिनिधी
मुंबई : मातोश्री समोर येऊन हनुमान चालीसा वाचण्याच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला रविवारच्या सुटीकालीन महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. राणा दंपत्या विरुद्ध विविध 5 कलमांद्वारे आरोप लावण्यात आले आहेत. Navneet Rana: Rana couple in custody for 14 days in conflict with Shiv Sena !!
महाराष्ट्रात हनुमान चालिसाच्या पठणावरून राजकीय वर्तुळात सतत गदारोळ सुरू आहे. शनिवारी मुंबईतील खार भागातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी, ताज्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे नेले. सुनावणी घेऊन दंडाधिकाऱ्यांनी राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आज रिमांड प्रक्रियेदरम्यान नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने वकील रिझवान मर्चंट हजर राहिले. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना कलम १५३ A अंतर्गत म्हणजेच धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल अटक केली होती.
मुंबई पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.मुंबई पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात कलम १५३ (A), ३४, IPC R/W ३७ (१) १३५ बॉम्बे नुसार गुन्हा दाखल केला आहे. आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना त्यांच्या खार येथील घरातून ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास खार पोलीस ठाणे करीत आहेत.
Navneet Rana : Rana couple in custody for 14 days in conflict with Shiv Sena !!
महत्त्वाच्या बातम्या
- वायले सूर हमारे तुम्हारे; तो सूर बने बिखरे!!
- Shivsena – AAP : राणा दाम्पत्य – शिवसेना संघर्षात आम आदमी पार्टी शिवसेनेच्या पाठीशी!!
- पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव सुरू
- दिल्लीत आजपासून पारा ४४ ते ४६ अंशावर
- ईडी, सीबीआयचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत, शरद पवार यांचा आरोप
- शरद पवार सुधारत नसल्यानेच महाविकास आघाडीतून बाहेर, राजू शेट्टी यांनी सांगतिले कारण
- भीती वाटली की शिवसैनिक सत्तेचा विषय आला की मात्र आठवत नाही, नारायण राणे यांची टीका