प्रतिनिधी
मुंबई : हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राजकीय पंगा घेणाऱ्या नवनीत राणा यांच्या विषयी राज्यभरात एक वेगळे औत्सुक्याचे आकर्षण राहिले आहे. त्या नेमक्या आहेत कोण?? त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आणि कुठे सुरू झाला?? महाराष्ट्राची त्या कशा जोडल्या गेल्या??, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.Navneet Rana: Modeling, South Cinema to Politics; Navneet Rana’s journey
खासदार नवनीत राणा यांचे बालपण मुंबईत गेले. नवनीत यांचे आई-वडील हे पंजाबी आहेत. त्या लुभाना समाजातून येतात. नवनीत यांचे वडील सेनेत अधिकारी होते. बारावीनंतरच त्यांनी मॉडलिंगमध्ये प्रवेश केला. कन्नड सिनेमातून आपल्या करिअरची सुरवात केली. याशिवाय त्यांनी तेलगू चित्रपट सीनू, वसंथी आणि लक्ष्मी (2004) मध्येही अभियन केला.
रवी राणा आणि नवनीत यांचा पहिला संपर्क बाबा रामदेव यांच्या योग शिबिरात आला ओळख झाल्यावर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 मध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमातच त्यांनी 3100 जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केले. त्यावेळी रवी राणा हे बडनेराचे आमदार होते. त्यांच्या लग्नात रामदेवबाबा तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते. लग्नानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांचा पराभव
2014 मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्यावेळी त्या पराभूत झाल्या. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात त्या निवडणुकीत उभ्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत मात्र आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला.
बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप
2019 च्या निवडणुकीत अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती. नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला. दोन लाख रुपयांचा दंडही न्यायालयानं ठोठावला होता. अमरावतीतून अर्ज भरताना त्यांना मोची (चर्मकार) जातीचे प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढविली होती.
शिवसेनेवर गंभीर आरोप
अमरावतीत त्यांचा शिवसेनेशी जुना पंगा आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असताना निवडून आल्या तरी नंतर नवनीत राणा यांनी मोदी सरकारला अनुकूल अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली.
मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली असल्याने राष्ट्रपती लागू करावी, अशी मागणीही त्यांनी लोकसभेत केली होती.
मुंबईची लेक, अमरावतीची सून!!
राज्यात शासनव्यवस्था ढासळली आहे. याला मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. त्यांनी हनुमान चालीसा म्हणून राज्यावरील संकट दूर करावे, अशी भूमिका राणा दाम्पत्याने घेतली. मुख्यमंत्री हनुमान चालीसा म्हणत नसतील तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणू यासाठी त्या आक्रमक झाल्या. त्यामुळे नवनीत राणा महाराष्ट्रभर चर्चेत आल्या.
उद्या मोदींचा दौरा म्हणून माघार
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये होऊ नये या पार्श्वभूमीवर आपण हनुमान चालीसा वाचनाचा कार्यक्रम स्थगित करत आहोत अशी भूमिका नवनीत राणा यांनी घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App