• Download App
    डॉ.शिरीष गोडे यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये केला प्रवेश ; वर्धा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्काDr. Shirish Gode resigns, joins Congress; Big shock to BJP in Wardha district

    डॉ.शिरीष गोडे यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये केला प्रवेश ; वर्धा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का

    दोन महिन्यांपूर्वी डॉ.शिरीष गोडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले होते.Dr. Shirish Gode resigns, joins Congress; Big shockto BJP in Wardha district


    विशेष प्रतिनिधी

    वर्धा : वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे यांनी आज भाजपला राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी डॉ.शिरीष गोडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले होते.दरम्यान गोडे यांनी अखेर राजीनामा दिला.

    चंद्रकांत पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत गोडेंची राजीनामा देऊ नका याबाबत समजूत काढली होती. मात्र भाजपमध्ये घुसमट होत असल्याची भावना गोडेंनी व्यक्त केली.



    डॉ.शिरीष गोडे दोन वर्षांपासून अध्यक्ष होते. त्या पूर्वी २०१४ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे डॉ.शिरीष गोडे चिरंजीव आहेत. डॉ गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते. मात्र संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

    पुढे भाजपामध्ये प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खेडोपाडी भाजपा मजबूत करण्याचे कार्य केले. संघनिष्ठ भाजपा नेतेही पक्ष चालवावा तो गोडेनीच, अशी प्रशस्ती देत. त्यांच्या निर्णयास एकही नेता विरोध करीत नसे. तर पटोले म्हणाले की, गोडे यांचा सर्व तो सन्मान राखून त्यांना जबाबदारी दिली जाईल.

    Dr. Shirish Gode resigns, joins Congress; Big shock to BJP in Wardha district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    खरंच दुसरा स्वातंत्र्यलढा, की गुलामीची मानसिकता कुरवाळायची सवय??

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’