विशेष प्रतिनिधी
मुंबई : इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मर्दुमकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण जनता सारे काही पाहत आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक निर्माण झाले आहे. लोकशाहीत मते मांडण्याचा अधिकारच संपविला जात असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.Devendra Fadnavis accused of anarchy in the state due to Shiv Sena’s bullying
लोकशाहीचे गाऱ्हाणे गाणारे आज सोयीस्करपणे गप्प का आहेत, असा सवाल करत फडणवीस म्हणाले, राज्यात व्यथित करणाºया घटना घडत आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले झाले. पण आरोपींना अटक नाही. मोहित कंभोज यांच्यावरील हल्ल्यानंतर साधा गुन्हाही दाखल झाला नाही. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली, पण त्याची साधी दखलसुद्धा नाही. हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य आले तर थेट अटक केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App