विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या भयावह घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये दरोडेखोरांनी गावातील दोन महिलांवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.सर्वच स्तरावर याविषयी संताप व्यक्त होत आहे. AURANGABAD RAPE CASE: Sanjay Raut’s writing for the protection of the corrupt instead of the protection of women! Chitra Wagh gets angry with Sanjay Raut over Aurangabad rape incident
औरंगाबादच्या घटनेवरुन भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ देखील सरकारवर संतापल्या आहेत.शिवसेना खासदार संजय राऊतांवरही त्यांनी टीकेचे आसडू ओढले आहेत.
१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय…कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल.. — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) October 21, 2021
१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय…कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल..
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) October 21, 2021
संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचीत उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसल्यामुळे संजय राऊतांपर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहचली नसेल असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे
राज्यातील मंत्री पोलिस बदल्यांत ‘मलई‘ खाण्यात व्यस्त आहे.. सक्षम पोलिस अधिकारी बाजूला फेकले गेलेत.. त्याचाच परिणाम कायदा सुव्यवस्थेवर दिसतोय….गुन्हेगारी वाढलीय… राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलिस यंत्रणा औरंगाबाद घटनेतील दरोडेखोरांना कसं पकडणार ? — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) October 21, 2021
राज्यातील मंत्री पोलिस बदल्यांत ‘मलई‘ खाण्यात व्यस्त आहे.. सक्षम पोलिस अधिकारी बाजूला फेकले गेलेत.. त्याचाच परिणाम कायदा सुव्यवस्थेवर दिसतोय….गुन्हेगारी वाढलीय…
राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलिस यंत्रणा औरंगाबाद घटनेतील दरोडेखोरांना कसं पकडणार ?
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी घरातील वस्तू आणि पैसेही या दरोडेखोरांनी चोरले आहेत.
यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी बलात्कार केला. ज्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाला त्यातल्या एका महिलेला आठ महिन्यांचं बाळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App