प्रतिनिधी
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासंबंधीच्या बऱ्याच आतल्या बातम्या आता उघड होऊन सोशल मीडियावर फिरायला लागल्यात. नारायण राणेंना अटक करून भाजपला धडा शिकविण्याची आयडिया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असल्याची बातमीही त्यातून फिरते आहे. Anil Parab (Maharashtra Minister) is behind the arrest of Narayan Rane. We demand a CBI inquiry into the arrest and the entire procedure of action
असे असताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र आपल्या निशाण्यावर परिवहन मंत्री अनिल परबांना घेतले आहे. अनिल परबांचा रत्नागिरीतल्या व्हायरल विडिओवरून भाजपचे नेते आमदार आशिश शेलारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप सर्वांनी पाहिली आहे. यातून दिसत आहे की अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे आशिश शेलारांनी सांगितले.
Anil Parab (Maharashtra Minister) is behind the arrest of Narayan Rane. We demand a CBI inquiry into the arrest and the entire procedure of action. Why is the Maharashtra govt so scared of Jan Ashirvaad Yatra that they are behaving like this?: Maharashtra BJP MLA Ashish Shelar pic.twitter.com/LQzmAYQZ22 — ANI (@ANI) August 25, 2021
Anil Parab (Maharashtra Minister) is behind the arrest of Narayan Rane. We demand a CBI inquiry into the arrest and the entire procedure of action. Why is the Maharashtra govt so scared of Jan Ashirvaad Yatra that they are behaving like this?: Maharashtra BJP MLA Ashish Shelar pic.twitter.com/LQzmAYQZ22
— ANI (@ANI) August 25, 2021
नारायण राणेंना मधुमेह असताना जेवण करुन दिले नाही, त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. ठाकरे सरकारची ही तालिबानी मानसिकता आहे. सुरुवात तुम्ही केली आणि आता शेवट आम्ही करु असा इशाराच यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वातंत्र्य दिनाचे अज्ञान कसे लपवायचे याचा हा थयथयाट आहे. हिरक महोत्सव की अमृतमहोत्सव अशी स्वातंत्र्य दिनाबाबत विचारणा करणे हाच देशाचा अपमान आहे. भाजप युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75 हजार पत्र लिहिणार आहे, की मुख्यमंत्री महोदय हा देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव आहे.
संयमी असलेल्या शरद पवारांसोबत राहूनही शिवसेनेचे संकुचित राजकारण सुरू आहे, अशी मखलाशीही आशिष शेलार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App