
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्हाला काही करण्याची गरज नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांतील अंतर्विरोधानेच हे सरकार पडेल. ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही निश्चितपणे पर्याय देऊ, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत आमच्या एकत्र येण्यावर बंधने असल्याचेही त्यांनी सांगितले.We don’t need to do anything, Mahavikas Aghadi government will fall into contradiction, Devendra Fadnavis made it clear
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, हे सरकार अंतर्विरोधाने भरलेले आहे. त्यांच्यामधील अंतर्विरोध आता मोकळा होत असून देशाच्या इतिहासात अंतर्विरोध असलेल्या कोणत्याही सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.
आज सत्तेमुळे तीन पक्ष एकमेकांना चिकटलेले असले तरी सत्ता फार काळ एकत्र ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे स्वार्थ आहेत आणि ते मारले गेले की प्रत्येकाला खुर्चीत बोचायला लागते. आज तीच परिस्थिती बघायला मिळत आहे. आम्ही सत्तेकडे नजर लावून बसलेलो नाही पण अंतर्विरोधाने सरकार पडल्यास आम्ही निश्चितपणे पर्याय देऊ. राजकारणात पर्याय नेहमीच असतात. तोपर्यंत आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू.
भाजप मनसेसोबत युती करणार का याविषटी फडणवीस म्हणाले की, भाजपला व्यापक हिंदुत्वाची अपेक्षा आहे. भाषा, प्रांताच्या आधारे भेदभाव आम्हाला मान्य नाही. मराठी माणसाला महाराष्ट्रात प्राधान्य मिळालेच पाहिजे पण म्हणून इतरांवर अन्याय करावा हे आम्हाला मान्य नाही
त्या बाबतच्या राज ठाकरे भूमिकेविषयी स्पष्टता येत नाही तोवर आमच्या एकत्र येण्यावर बंधने आहेत. मात्र, माझ्या आणि राज यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कधीही दुरावा आलेला नाही. मनसेने हिंदुत्व स्वीकारले आहे आणि मला वाटते की तो आम्हाला जोडणारा धागा आहे.
We don’t need to do anything, Mahavikas Aghadi government will fall into contradiction, Devendra Fadnavis made it clear
महत्त्वाच्या बातम्या
- गुंतवणूकगुरू राकेश झुनझनवाला सुरू करणार नवीन एअरलाईन्स सुरू करणार, सर्वात कमी दर ठेऊन करणार भारतीय विमानसेवेत क्रांती
- इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार
- नारायण राणेंवर टीका करताना भास्कर जाधव बरळले, म्हणाले असली मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी येऊ नयेत
- कोरोना निर्बंध शिथिल : मुंबईत दुकाने, हॉटेल्सना वेळ वाढवून मिळणार!; २५ जिल्ह्ंयाना देखील मिळेल लाभ