Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या भाजपच्या राज्यव्यापी ओबीसी आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींना चार महिन्यात आरक्षण देऊ शकलो नाही तर संन्यास घेईन, असे विधान फडणवीसांनी केले होते. यावर राऊत म्हणाले, 2014 मध्ये धनगर आरक्षणाबाबतही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री व इतर सत्ताधारी आरक्षणासाठी आग्रही आहेत. त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जात आहेत. यात राजकारण आणण्याची गरज नाही. त्यांच्याकडे पाच वर्षे होती, त्यांनी काही केलं नाही. ईडीच्या अनिल देशमुखांवरील कारवाईवर राऊत म्हणाले की, पवार साहेब म्हणतात ते बरोबर आहे. सत्ता नसल्याने आलेल्या नैराश्यातून अशी कारवाई सुरू आहे. सत्ता पक्षातल्या नेत्यांवर ठरवून कारवाई केली जातेय. राज्यातील संस्था सक्षम असतानाही केंद्रीय पथकं आणणं संघराज्य व्यवस्थेला हे हानिकारक आहे. WATCH Shiv Sena MP Sanjay Raut Reaction On BJP Agitations Over OBC Reservation Issue
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App