विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी हाणली, पण निदान ती कॉपी करण्याची वडेट्टीवार यांची कारणे तरी मोठी निघाली.Vijay wadettiwar
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर ते मिटले. पण त्याआधी काँग्रेसने बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला होता त्या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ती टीका करतानाच वडेट्टीवार यांनी शरद पवार यांची कॉपी हाणली. महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प चालू आहेत. मुंबईतल्या जमिनी एका उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहेत.
ते करताना राज्य सरकार हात आखडता घेत नाही, पण शेतकऱ्यांना छोटी मोठी मदत करताना देखील राज्य सरकारच्या हाताला लकवा मारतोय, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या व्यापक मतदार संदर्भात ते बोलले.
पण सरकारच्या हाताला लकवा मारण्याची टीका महाराष्ट्रात तरी अजिबात नवीन नाही. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हाताला लकवा मारल्याची टीका केली होती. कारण पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांना हव्या असलेल्या म्हणजे त्यांच्या “इंटरेस्टच्या” फायलींवर सह्या करायला टाळत होते. म्हणून शरद पवारांनी संतापून मुख्यमंत्र्यांच्या हाताला सह्या करण्यासाठी लकवा मारलाय का??, असा सवाल केला होता. शरद पवारांना स्वतःच्या “इंटरेस्टच्या” फायलींमध्ये जास्त रस होता म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक झोंबणारी टीका केली होती, पण वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी जरूर केली, पण निदान ती टीका शेतकऱ्यांच्या मदतीसारख्या व्यापक मुद्द्यावर तरी केली. पवारांसारखे ते फक्त राजकीय स्वार्थात अडकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App