विशेष प्रतिनिधी
पुणे : कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत वाहन शिरल्याने झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले आहेत. Vehicle hit to Alandi’s Dindi; Two Warkaris killed, 30 injured
हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. कान्हेफाटा येथे ही दुर्घटना घडली. यानंतर पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने जात होते. तेव्हा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App