• Download App
    उदयनराजे म्हणाले , ' जरंडेश्वार' प्रकरणी जबाबदार असलेल्या संचालकांकडून वसुली व्हावी |Udayan Raje said, recovery should be made from the director responsible for 'Jarandeshwar' case

    उदयनराजे म्हणाले , ‘ जरंडेश्वार’ प्रकरणी जबाबदार असलेल्या संचालकांकडून वसुली व्हावी

    सातारा जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेतली.Udayan Raje said, recovery should be made from the director responsible for ‘Jarandeshwar’ case


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : जरंडेश्वार कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली होती. आता यातून सक्तवसुली संचालनालय या कर्जाची संचालकांकडून वसुली करण्याची शक्यता आहे.जे संचालक याला जबाबदार आहेत, त्यांच्याकडूनच वसुली व्हावी, असे स्पष्ट करून हे निवडून बँकेवर जातात आणि आम्ही गेलो की जागा अडवली काय. मी जाग अडवली असेल,

    तर मग सगळ्यांनाच बाहेर काढा. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी दहा तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसे झाले तर माझी सपशेल माघार असेल, असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या राष्ट्रवादीचे संचालक व अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.



    सातारा जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेतली. जरंडेश्वार शुगर मिल कर्ज प्रकरणाची माहिती मागितली. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की ‘जरंडेश्वार शुगर मिल’ला कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली होती.

    बँकेत जागा अडवणाऱ्यांना संधी नाही या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, की बँकेत कोणी जागा अडवली हे त्यांना माहिती आहे. बँकेची चौकशी लागली तरी त्यांना याबाबत माहिती दिसत नाही. आत्ता निवडणूक लागलेली असल्यामुळे बँकेत त्यांचे येणे जाणे सुरू झाले असल्याची टीका त्यांनी शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता केली.

    Udayan Raje said, recovery should be made from the director responsible for ‘Jarandeshwar’ case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना