विशेष प्रतिनिधी
मुंबई :Sunetra Pawar राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाची घडामोड चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात पक्षातील काही निवडक पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, बाकीच्या नेत्यांच्या पदांबाबत मात्र मौन पाळल्याचे दिसते.Sunetra Pawar
या पत्रात सुनेत्रा पवार यांचा ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शिवाजीराव गर्जे यांना ‘खजिनदार’ म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, एकूण 14 पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली असतानाही प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतर 12 जणांच्या नावापुढे कोणतेही पद नमूद करण्यात आलेले नाही.Sunetra Pawar
विशेष म्हणजे, पक्षातील इतक्या महत्त्वाच्या नेत्यांच्या पदनामांचा उल्लेख टाळण्यात आल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या पावलामागे काही अंतर्गत रणनीती असू शकते, तर काहीजण याकडे पक्षातील सत्तासंतुलनाच्या दृष्टीनेही पाहत आहेत.
याआधी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे सध्याच्या पत्रात त्याच नेत्यांच्या पदनामांचा अभाव अधिकच लक्षवेधी ठरत आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण कार्यकारिणीची माहिती आणि अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. त्यानुसारच सुनेत्रा पवार यांच्या निवडीची माहिती देणारे पत्र आयोगाला पाठवण्यात आले आहे. मात्र, या पत्रात केवळ दोनच पदांचा उल्लेख करण्यात आला असून, इतर पदाधिकाऱ्यांच्या भूमिकांबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी प्रफुल्ल पटेल यांची ‘राष्ट्रीय कार्याध्यक्ष’ आणि सुनील तटकरे यांची ‘प्रदेशाध्यक्ष’ म्हणून नियुक्ती जाहीर झाली होती. तरीदेखील अधिकृत पत्रात या दोघांच्या पदांचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App