• Download App
    maharashtra महायुती आणि महाविकास आघाडीचे त्रांगडे; छोट्यांनाही पडू लागली खुर्चीवर बसायाची स्वप्ने!!

    Maharashtra महायुती आणि महाविकास आघाडीचे त्रांगडे; छोट्यांनाही पडू लागली खुर्चीवर बसायाची स्वप्ने!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीचे त्रांगडे; छोट्यानाही पडू लागली खुर्चीवर बसायची स्वप्ने!!, अशी अवस्था आता महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे.

    महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमधून 6 मोठे पक्ष आमने-सामने आले असताना छोटे पक्षही निवडणुकीच्या मैदानात काही अपेक्षेने उतरले आहेत. यामध्ये मनसे, परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी आणि हैदराबादच्या ओवैसीनचा एआयएमआयएम पक्ष सामील आहेत. या छोट्या पक्षांनी आपापल्या राजकीय वकुबानुसार उमेदवार उभे केले आहेत. त्यातल्या त्यात मनसेने 100 पेक्षा जास्त उमेदवार उभे करून राजकीय पुनरुज्जीवनाचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी पहिल्या सभेपासून आपले आमदार निवडून येणार आणि ते सत्तेत बसणार असा धोशा लावला आहे.


    Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला


    पण सत्तेवर बसण्याची स्वप्ने पाहणारे राज ठाकरे एकटेच नाहीत. त्यांच्या पाठोपाठ एआयएमआयएमच्या इम्तियाज जलील यांना देखील सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. वास्तविक एआयएमआयएमने फक्त 14 उमेदवार उभे केले आहेत. त्यातले 4 दलित आहेत पण महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणालाही बहुमत मिळणारच नाही आणि बहुमतासाठी आपल्या 5 – 10 आमदारांसाठी त्यांना त्यांच्यापैकी कोणालाही आपल्या दारात यावे लागेल, असे राज ठाकरे आणि इम्तियाज जलील यांना वाटत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा पाठिंबा मागायला घरी येतील, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.

    परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांचेही मत यापेक्षा फारसे वेगळे नाही, कारण त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडे कल असलेले नेते आहेत. त्यांनी एकत्र येऊन 30-40 उमेदवार उभे केले आहेत. त्यांनाही आपल्या 2 – 5 आमदारांच्या बळावर सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत.

    Smaller parties daydreaming of power in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shambhuraj Desai : खासदारांचे विलीनीकरण पूर्णपणे घटनात्मक; ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तर

    Prakash Ambedkar : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

    Uddhav Thackeray : जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी; म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका