नाशिक : दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात, याचा निर्णय पुढच्या पिढीने यायचा असे सांगून स्वतः शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पुडी सोडली होती. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रतिसाद मिळत नाही हे पाहिल्यावर त्यांनी मध्यंतरी कानावर देखील हात ठेवले होते. पण आता तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांचा एकीकरण करायला विरोध असल्याचे पाहून पवारांनी या तिसऱ्यांदा एकीकरणाच्या विषयावर पलटी मारली. Sharad Pawar
अवघ्या महिनाभराच्या आत शरद पवारांच्या तीन वेगवेगळ्या भूमिका महाराष्ट्रासमोर आल्या. यातून महाराष्ट्राचे राजकारण तर सोडाच, खुद्दराष्ट्रवादीतलेच राजकारण हे शरद पवारांच्या हातात उरलेले नाही हे दारूण वास्तव या निमित्ताने समोर आले.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त १० आमदार निवडून आले. त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार भाजपच्या सत्तेच्या वळसणीला बसले. त्यातले ९ आमदार मंत्री झाले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली अस्वस्थता वाढली पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांपुढे सत्तेमध्ये जाण्याचा लकडा लावला. म्हणून मध्यंतरी शरद पवारांनी दोन राष्ट्रवादी एक होऊ शकतील. पण याबद्दल पुढच्या पिढीने निर्णय घ्यायचा आहे, अशी राजकीय पुडी सोडून दिली होती.
ऐक्यातून धोका
पण पवारांच्या सूचनेतला हा धोका प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ओळखला. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर पवारांची मुलगी आणि पवारांचा पुतण्या यांना भाजप राजकारणात settle करेल पण मधल्या मध्ये आपली राजकीय भवितव्याची वाट लागून जाईल, याची धास्ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटली. म्हणून या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चाच विझवून टाकली. अजित पवारांनी देखील शरद पवारांच्या राजकीय पुडीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कारण त्यांना आपल्या अधिकारात सुप्रिया सुळे यांच्या अधिकाराची मिसळण नको होती.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सकारात्मक प्रतिसादच मिळत नाही हे पाहिल्यावर मध्यंतरी शरद पवारांनी एकीकरणाच्या मुद्द्यावर मला माहिती नाही असे सांगून कानावर हात ठेवले होते.
पिंपरी चिंचवड मध्ये वक्तव्य
पण आज पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी पुरती पलटी मारली. संधीसाधूपणा करून भाजपच्या बरोबर जाणाऱ्यांना आम्ही आमच्या बरोबर घेणार नाही. कारण भाजप बरोबर जाणे गांधी, नेहरू, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी केले. बाकी सगळ्यांच्या बरोबर जाऊ. सगळ्यांना बरोबर घेऊ. पण भाजप बरोबर जाणाऱ्यांना आम्ही बरोबर घेणार नाही, असे शरद पवारांनी सांगितले. पवारांना मत व्यक्त करायचा अधिकार आहे, अशी एकाच वाक्यात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. पण आजच्या वक्तव्यातून शरद पवारांनी तिसऱ्यांदा पलटी मारल्याचे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App