माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!! हे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीने सिद्ध केले. Sharad Pawar
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधक नको अशी भूमिका सुरुवातीला पवारांनी घेतली होती, पण नंतर अजित पवारांच्या पॅनलला विरोध होईल याचा आडाखा बांधून विरोधी मते फोडण्यासाठी त्यांनी योगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा पॅनेल निवडणुकीत उतरविले. ही पवारांची खेळी अजितदादांना मोठा विजय देऊन गेली, असा दावा मराठी माध्यमांनी केला. महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायलेल्या आणि दीर्घकालीन राजकीय आखाडे रचण्यात वाकबगार असलेल्या शरद पवारांनी आपल्या पराभवातून वेगळेच राजकीय गणित साधल्याची चर्चा मराठी माध्यमांनी केली.
अजित पवारांच्या “बी” टीमचे नेते उरले पवार
पण ही चर्चा “पवार बुद्धीच्या” चर्चेपलीकडली ठरली नाही. कारण “गिरे तो भी टांग उपर”, हा “पवार बुद्धीच्या” राजकीय चर्चेचा उत्कर्ष बिंदू असतो. त्यानुसारच पवारांनी उभे केलेले बळीराजा पॅनेल निवडणुकीत झोपले, तरी पवारांनी त्यातून वेगळेच राजकीय गणित साधले, असा दावा मराठी माध्यमांनी केला. पण पवारांनी उभे केलेले बळीराजा नावाचे पॅनल फक्त विरोधकांची मते पडू शकले. प्रत्यक्ष निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शरद पवार हे आता अजित पवारांच्या “बी” टीमचे नेते उरले, हे “राजकीय सत्य” मराठी माध्यमांनी सांगितले नाही.
बारामती एकतर्फी नाही उरली
एरवी पवारांची राजकारणात चलती होती, त्यावेळी पवार काका – पुतण्यांनी दिल्ली आणि मुंबईत बसून माळेगावची निवडणूक “हँडल” केली असती. मूळात निवडणूकच बिनविरोध केली असती. आपल्याच समर्थकांमधून आपल्याला हवी ती माणसे निवडून संचालक मंडळावर धाडली असती. कारखान्यावरचा एकहाती वरचष्मा कायम ठेवला असता. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.
कारण बारामतीतली निवडणूक एकतर्फी उरलेलीच नाही.
माळेगाव कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी शरद पवारांना बारामतीत यावी लागले.
अजित पवारांना बारामती तळ ठोकून बसावे लागले. स्वतःचा चेअरमन पदासाठी अर्ज दाखल करावा लागला. निवडणुकीत प्रचार करावा लागला.
शरद पवारांना युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा नावाचे पॅनेल तयार करावे लागले. या निवडणुकीतल्या पराभवाच्या ठपका आपल्या मुलीवर बसू नये याची “राजकीय काळजी” घ्यावी लागली. तिला या निवडणुकीपासून बाजूला ठेवावे लागले.
कशी का होईना, पण काका आणि पुतण्याला माळेगावची निवडणूक लढवावी लागली, हा खरं म्हणजे पवारांच्या राजकीय कारकीर्दीतला सगळ्यात मोठा पराभव ठरला.
माळेगाव साखर कारखान्याच्या मतदारांनी तो पराभव पवारांच्या पदरात किंवा खिशात टाकला. फक्त तो “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना नीट समजला नाही. किंबहुना समजूनही त्यांनी तो स्वीकारण्याचा दम दाखवला नाही.
खरी उत्तरे शोधण्याचा मराठी माध्यमांमध्ये दम नाही
“गिरे तो भी टांग उपर” या “पवार बुद्धीच्या” न्यायाने त्यांनी पवारांच्या दारुण पराभवात त्यांचा “विजय” शोधला. तो महाराष्ट्र समोर मांडला. पवार कसे महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायले, ते दीर्घकालीन राजकीय आडाखे बांधण्यात कसे वाकबगार आहेत याची वर्णने केली, पण महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायलेल्या आणि राजकारणात दीर्घकालीन आडाखे बांधण्यात वाकबगार असलेल्या शरद पवारांना आपल्या मुलीच्या नेतृत्वाखाली पॅनल का उभे करता आले नाही किंवा त्यांनी का उभे केले नाही आणि ते निवडून का आणता आले नाही?, याचे उत्तर देता आले नाही. 55 -60 वर्षांची दीर्घ कारकीर्द असणाऱ्या पवारांना अजूनही आपल्या मुलीला राजकारणात settle का करता आले नाही?, या सवालाचे खरे उत्तर शोधणे तर दूरच, तो सवाल खुद्द पवारांना विचारण्याचा दम देखील मराठी माध्यमांना दाखवता आला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App