नाशिक : पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले. हे उघडे नागडे सत्य जेव्हा सगळ्या जगासमोर आले, तेव्हा मात्र शरद पवार आणि त्यांच्या लिबरल गॅंगला दहशतवाद्यांच्या धर्माची चर्चा नकोशी वाटायला लागली!! अंगावर पडलेल्या पालीसारखी त्यांनी ती चर्चा झटकून टाकली.
“पवार बुद्धी”च्या लिबरल गॅंगने कालपासूनच दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवाद हा दहशतवाद असतो. दहशतवाद्यांनी कितीही धार्मिक नंगानाच घातला, तरी त्यांना धर्म नसतो. त्यांनी मानवतेची हत्या केली. काश्मिरियतची हत्या केली, अशी बकवास राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, छाया थोरात, विकास लवांडे, दादा क्षीरसागर या गॅंगने चालविली होतीच. या सगळ्यांनी वेगवेगळी ट्विट करून दहशतवादाला धर्म नसतो, असा डांगोरा पिटला होता. त्यात पवारांनी आज पत्रकार परिषदेतून भर घातली. पवारांनी देखील पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर दहशतवादाच्या धर्माची चर्चा होतेच कशी??, असा मानभावी आणि शहाजोग सवाल केला.
वास्तविक पुण्यातल्या ज्या गनबोटे आणि जगदाळे कुटुंबीयांना पहलगाम मधल्या हत्याकांडाची झळ बसली आणि घरातली प्रिय व्यक्ती गमवावी लागली, त्या कुटुंबीयांची पवारांनी स्वतः जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी गनबोटे कुटुंबीयांमधल्या महिलांनी त्यांना आपबीती जाहीरपणे सांगितली होती. दहशतवाद्यांनी आम्हाला धर्म विचारला. कलमा पढायला लावला. त्यामुळे आम्ही पटापट कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या. अल्ला हूॅं अकबर म्हणालो, तरी देखील आमच्यातल्या पुरुषांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, असे गनबोटे कुटुंबीयांमधल्या महिलांनी डोळ्यात अश्रू आणून पवारांना सांगितले. त्यावेळी पवारांनी ते सगळे ऐकून घेतले. पवार तिथे एकटे नव्हते त्यांच्याबरोबर अंकुश काकडे आणि इतर कार्यकर्ते होते.
पण आजच्या पत्रकार परिषदेत मात्र शरद पवार त्याबद्दल खोटे बोलले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या का??, असा पत्रकारांनी त्यांना सवाल केल्यानंतर पवारांनी त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे उद्गार काढून चक्क कानावर हात ठेवले. इतकेच नाही तर दहशतवाद्यांनी पुलवामा मध्ये हल्ला केला त्याही आधी जम्मू-काश्मीरमध्ये तीन-चार ठिकाणी हल्ले केले. त्यावेळी धर्माची चर्चा पुढे आली नव्हती, मग ती आत्ताच कशी पुढे आली??, असा मानभावी आणि शहाजोग सवाल केला.
दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या का??, त्यात काय तथ्य आहे हे मला माहिती नाही. जे प्रवासी होते त्यात त्यांनी स्त्रियांना सोडलेले दिसते. पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यातल्या दोन कुटुंबांच्या घरी मी गेलो होतो तिथल्या भगिनींनी मला सांगितले की त्यांनी महिलांना हात लावला नाही. आमच्या पुरुषांना गोळ्या घातल्या, असे पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
गनबोटे कुटुंबीयांमधल्या महिलांनी टिकल्या काढून फेकल्या अल्ला हूॅं अकबर म्हटले. तरी देखील दहशतवाद्यांनी पुरुषांना गोळ्या घातल्या, हे पवारांना तोंडावर सांगितले होते. पण हे सत्य पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले नाही. “पवार बुद्धीच्या” लिबरल गँगने दोन – तीन दिवसांपासूनच दहशतवादाला धर्म नसतो वगैरे ट्विट करून तथाकथित धर्मनिरपेक्ष नॅरेटिव्ह सेट करत आणलाच होता, तो पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत पक्का करायचा प्रयत्न केला.
– पवारांचा खोटेपणा आणि सर्टिफिकेशन
पण पवारांचा असला खोटारडा प्रकार करायचा पहिलाच प्रयत्न नाही. याआधी देखील मुंबईत 12 ऐवजी 13 बॉम्बस्फोट केल्याचा “जावईशोध” शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना लावला होता. त्याचे त्यांनी वारंवार समर्थन केले होते. पण त्याचबरोबर बांगलादेशमध्ये हिंदूंचे शिरकाण होत असताना, पवारांनी तिथला राज्यकर्ता नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनूस याला धर्मनिरपेक्षतेचे “सर्टिफिकेट” देऊन टाकले होते. आज त्या पुढे पाऊल टाकून पवारांनी दहशतवाद्यांच्या धर्माची चर्चा होतेच कशी??, असा शहाजोग आणि मानभावी सवाल करून स्वतःची “धर्मनिरपेक्षता” सिद्ध करायचा प्रयत्न केला, पण म्हणून पहलगाम हल्ल्याचे इस्लामी जिहादी धर्मांधतेचे सत्य लपून राहिले नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App