Sanjay Raut : एअर इंडियाच्या विमान अपघातामागे सायबर हल्ला? संजय राऊत यांची शंका, अवघ्या 30 सेकंदांत कसे पडले!

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Sanjay Raut अहमदाबाद येथील विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात अहमदाबाद येथेच कसा झाला? या विमानतळाची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. या माध्यमातून संजय राऊत यांनी विमान अपघाताच्या प्रकरणात केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.Sanjay Raut

अहमदाबाद विमानतळावर म्हणजे ज्या ठिकाणाहून अपघातग्रस्त विमान उडवण्यासाठी परवानगी दिली, त्याचा मेंटेनन्स आणि इंजिनिअरिंग संदर्भात काही शंका माझ्या मनात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण सर्वात जास्त अपेक्षा करतो त्या डीजीसीए मध्ये क्षमतेपेक्षा 56 टक्के कर्मचारी कमी असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही तर अहमदाबाद विमानतळ कोणाच्या ताब्यात आहे? याच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. या सर्व बाबतीत लोकांच्या मनामध्ये संशय आहे. हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल, अशी भीती देखील राऊत यांनी व्यक्त केली.



अहमदाबाद विमानतळ देखभालीचे कंत्राट कोणाकडे?

खासदार संजय राऊत म्हणाले की “मी तज्ञ नाही, पण अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर 30 सेकंदांच्या आत कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या गडबडीबाबत गंभीर प्रश्न आहेत. कोणत्याही शत्रू देशाने विमानाच्या यंत्रणेवर सायबर हल्ला केला होता का, कारण ते आपल्या सायबर हल्ल्यांनी आपल्या लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात? बोईंग करार झाला तेव्हा भाजप विरोधात होता आणि त्यावेळी प्रफुल्ल पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री होते. लोक आता विमानाने प्रवास करण्यास घाबरतात. विमान वाहतूक क्षेत्रासाठी देखभाल ही गुरुकिल्ली आहे. अहमदाबादसाठी देखभालीचे कंत्राट कोणाकडे आहे? यासाठी अहमदाबादची निवड का करण्यात आली? अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताना अपघात का झाला? विमानाच्या ढिगाऱ्यावर मंत्री ज्या पद्धतीने वावरत होते ते खरोखरच दुःखद आहे.”

संजय राऊत यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

अहमदाबाद विमानतळ कोणाच्या ताब्यात आहे?
याच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे?
सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडले का?
30 सेकंदात विमान कसे पडले?
विमानतळावर सहज कोणाला प्रवेश कसा मिळू शकतो?
अहमदाबादच का निवडले?
अहमदाबादलाच का अपघात झाला ?
भारतावरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ

संजय राऊत यांनी विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करुन देशावरील सायबर हल्ल्यांत झालेल्या वाढीवर देखील चिंता व्यक्त केली आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशावरील सायबर हल्ल्यात वाढ झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. विमान अपघातात अशा हल्ल्याची शंका येत असल्याचेही ते म्हणाले.

सरकारला फार दुःख झालेले दिसत नाही

या संदर्भात संजय राऊत यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर देखील निशाणा साधला. अपघातात 300 पेक्षा जास्त माणसे मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र सरकारला फार दुःख झालेले दिसत नसल्याचे ते म्हणाले. सरकारच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या सध्या तरी दिसत नाही. मात्र, असे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अहमदाबाद विमानतळ हे केंद्रबिंदू आहे. त्या विमानतळावर सहज कोणाला प्रवेश कसा मिळू शकतो? अपघात अहमदाबादमध्येच का झाला. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

श्वेत पत्रिका काढण्याची मागणी

पालघर मध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्याच पद्धतीचा हा अपघात आहे. यात भारताची माणसे मेली आहे. यातून सरकार काय धडा घेणार? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. एअर इंडियाचे खासगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूह एअर इंडिया संदर्भात गंभीर आहे की नाही? असा प्रश्न गेली वर्षभर उपस्थित केला जात आहे. विमानांची दुरुस्ती आणि विमानांची सेवांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे देखील ते म्हणाले. विमानाचा घटनांपेक्षा त्यांच्या व्यवहारावर श्वेत पत्रिका काढण्याची मागणी झाली पाहिजे. विरोधी पक्ष जर अशी मागणी करत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यामध्ये राफेल पासून सर्व व्यवहारांची श्वेतपत्रिका काढायला हवी, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut: Air India Crash Cyberattack Suspicion, Questions

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात