नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ( Samrudhi Mahamarg ) येत्या सप्टेंबरपासून सर्वांकरिता खुला करण्याच्या हालचाली एमएसआरडीसीने सुरू केल्या आहेत. महामार्गाचे 76 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएसआरडीसीने केला आहे. लवकरच या महामार्गावरून प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. SamrudhiMahamarg: Nagpur-Mumbai Samrudhi Highway will be open to all in September
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ( Samrudhi Mahamarg ) येत्या सप्टेंबरपासून सर्वांकरिता खुला करण्याच्या हालचाली एमएसआरडीसीने सुरू केल्या आहेत. महामार्गाचे 76 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएसआरडीसीने केला आहे. लवकरच या महामार्गावरून प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी (Balasaheb Thackeray samrudhi mahamarg ) महामार्ग बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग असून एकूण सहा मार्गिका आहेत. सुमारे 55 हजार कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे. दहा जिल्ह्यातून, 26 तालुके आणि 392 गावातून जाणारा हा महामार्ग असून 24 ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. या मार्गामुळे हे अंतर अवघ्या सात तासात पार करता येईल. व्यवसाय, उद्योग आणि व्यापाराला यामुळे चालना मिळणार आहे.
सध्या या प्रकल्पाचे काम 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असा एमएसआरडीसीचा दावा आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या कामांचा आढावा घेत, प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान शिर्डी ते नागपूर टप्प्यातील बहुतांश काम अंतिम टप्प्यात आल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांना सांगितले. सप्टेंबरपर्यंत हा महामार्ग पूर्ण करून सर्वांकरिता खुला केला जाईल, तशी तयारी असल्याची ग्वाही एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App