प्रतिनिधी
संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे पुत्र, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला. तसेच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाले आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आले?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत. MIDC plot in 10 days to Ritesh + Genelia Deshmukh’s company with fast work
मात्र देश अग्रो कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले असून कोणत्याही नियमबाह्य पद्धतीने कंपनीला एमआयडीसीचा प्लॉट मिळाला नसल्याचा खुलासा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटींचे कर्ज दिले. त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली?, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. या बाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे.
ज्या कंपनीचे भाग भांडवल हे साडेसात कोटी रुपये आहे, त्या कंपनीने एमआयडीसीकडे 15 कोटी 28 लाख रुपयाची रक्कम भूखंडासाठी भरली होती.
या प्रकरणी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “लातूर येथील सहकारी बँक ही एका कुटुंबाच्या मालकीची असल्यासारखा हा सर्व व्यवहार सुरू आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना 5 लाख रुपये कर्ज देण्याचे घोषणा केली होती. ते अद्यापही दिले नाहीत. मात्र कुटुंबातील व्यक्तीच्या खाजगी उद्योगाला 100 कोटी पेक्षा जास्त कर्ज अवघ्या काही दिवसात दिले. या बँकेतल्या ठेवी लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आहेत. शेतकऱ्यांच्या जीवावर हे सहकार क्षेत्र मोठे झालेला आहे. असे असताना येथील सत्ताधारी मात्र ते स्वतःसाठी वापरत आहेत.”
रितेश देशमुख यांच्या कंपनीचा खुलासा
भूखंडावरुन जेनेलिया आणि रितेश देशमुख होणाऱ्या आरोपांबाबत Agro कंपनीने खुलासा केला आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरू करायचा आहे. भूखंडावर घेतलेले आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
कृषी उद्योगात वाढ व्हावी हा देश अॅग्रो कंपनीचा उद्देश आहे. भूखंड रितसर आणि नियमानुसार लिजवर देण्यात आला आहे. या उद्योगासाठी नियमानुसार कर्ज वितरीत झाले आहे. कृषी आधारित उद्योगासाठी विरोधी भूमिका घेऊ नये, असे आवाहनही कंपनीने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App