मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय. MARATHWADA @ 74: Aurangabad ready for 74th Marathwada Mukti Sangram Day celebrations; Police mobilization; flag hoisting by the Chief Minister
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : 17 सप्टेंबर अर्थात 74 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये जय्यत तयारी झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालकमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती राहणार आहे . सकाळी 9.30 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शहरातील इतर नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याची मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात विभागीय आयुक्तालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबादच्या दौऱ्यात मुख्यमंत्री शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील तसेच पैठण येथील संतपीठाच्या उद्घाटनाची घोषणा करतील.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या दिवशी विविध राजकीय पक्षही आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलीस दलानेही काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली आहे.
उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन करतील. सकाळी 9.25 वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम स्थळी 400 च्या जवळपास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. वीस हजार चौरस फुटाच्या मंडपाची उभारणी केली असली तरी 200 लोकांनाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबादेतील दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांच्या विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे शिवसेनेने शहरात केलेल्या सो कॉल्ड विकासकामांसाठी उपरोधिक पद्धतीने धन्यवाद आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ते पुष्पवृष्टी करतील तसेच त्यांच्या आगमनाला तुतारीही वाजवली जाईल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा औरंगाबादमध्ये अडवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. खासदार संभाजीराचे छत्रपती यांना राज्य सरकारानं दिलेली आश्वासन पूर्ण केली नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App