विशेष प्रतिनिधी
नाशिक : सरकारी नियमांचे उल्लंघन करणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा किंवा सोमवारपासून मंदिर उघडी करा, अशी मागणी धार्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली. Jitendra Awhad Worshiped in the temple
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाविकांसाठी मंदिरे बंद असताना मंदिरात पूजा करून सरकारचा नियम मोडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी केली.
राज्यातील जनतेला वेगळा आणि मंत्र्यांना वेगळा न्याय आहे, अशी भूमिका ठाकरे सरकार घेत आहे. हे जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीमुळे स्पष्ट झाले आहे.धार्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुढे सांगितले की,गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली मंदिरे आता भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App