संजय राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, त्यांना बाबरी मशिद तोडण्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि ते बोलतच असतील तर तो त्यांच्या हलकटपणाचा कळस आहे अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.If Sanjay Raut is speaking, then the climax of weakness is the article written against the Ram temple
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, त्यांना बाबरी मशिद तोडण्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि ते बोलतच असतील तर तो त्यांच्या हलकटपणाचा कळस आहे अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.
याबाबत राणे यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या बाबरी मशिद तोडण्याच्या मुद्द्यावर टीका केली. राऊतांनी बाबरी मशिद तोडण्यावर बोलणे हलकटपणाचे कळस आहे. जेव्हा बाबरी मशिद तोडली तेव्हा सामनाचा पगार घेत होता का सामनामध्ये तरी आला होता का माझ्याकडे राऊतांचा एक लेख आहे. रामाची राजकीय फडफड असा त्यांचा लेख होता.
संजय राऊतांनी २६ एप्रिल १९९२ ला हा लेख लिहिला. हा लेख राममंदीराच्या विरोधात राऊतांनी लिहिला होता. हेच संजय राऊत जर तोंड उघडून बाबरी पाडल्याबद्दल विधान करीत असेल तर खरच हा हलकट पणाचा कळस आह, अशी टीका राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App