• Download App
    मंबईत अवघ्या २४ तासांत ३२ दिवसांचा पाणीसाठा, पाणीकपातीचे संकट टळले|Huge water collection in Mumbai dams

    मुंबईत अवघ्या २४ तासांत ३२ दिवसांचा पाणीसाठा, पाणीकपातीचे संकट टळले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महामुंबई क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठा वेगाने वाढला आहे. अवघ्या २४ तासांत तब्बल ३२ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.Huge water collection in Mumbai dams

    जुलै महिन्याचा पहिला पंधरावडा उलटून गेल्यानंतर तलाव क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून महामुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे.



    त्यामुळे तलावांमध्ये रविवारी दोन लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता, सोमवारी तोच चार लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहोचला. म्हणजे अवघ्या २४ तासांत पाणी साठा तब्बल एक लाख २८ हजार ९३ दशलक्ष लिटर जमा झाला.

    पाणीसाठ्यावर तसेच तलाव क्षेत्रातील पावसाचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे, असे पालिकेच्या पाणी खात्याकडून सांगण्यात आले.

    Huge water collection in Mumbai dams

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Tirupati Balaji : संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी; 11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन

    Sana Malik : सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही; सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

    Pritam Munde : प्रीतम मुंडे म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलू शकतं, तर बीडमध्ये का नाही? आता ‘शतप्रतिशत भाजप’ हवा