विशेष प्रतिनिधी
मुंबई : महामुंबई क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठा वेगाने वाढला आहे. अवघ्या २४ तासांत तब्बल ३२ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.Huge water collection in Mumbai dams
जुलै महिन्याचा पहिला पंधरावडा उलटून गेल्यानंतर तलाव क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून महामुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे.
त्यामुळे तलावांमध्ये रविवारी दोन लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता, सोमवारी तोच चार लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहोचला. म्हणजे अवघ्या २४ तासांत पाणी साठा तब्बल एक लाख २८ हजार ९३ दशलक्ष लिटर जमा झाला.
पाणीसाठ्यावर तसेच तलाव क्षेत्रातील पावसाचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे, असे पालिकेच्या पाणी खात्याकडून सांगण्यात आले.
Huge water collection in Mumbai dams
महत्त्वाच्या बातम्या
- वरिष्ठ अधिकारी महिलाही नाहीत सुरक्षित, छान ड्रेस घालता, फ्रेश दिसता म्हणून शेरेबाजी करणाऱ्या तरुणास अटक
- संपर्क अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेतील गटबाजीतून मारामारी
- संजय राऊत त्यांच्यासारख्या नेत्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष द्यायचे नसते, नितीश कुमार यांनी फटकारले
- माझी मुलगी कोरोना वॉर्डात डॉक्टर होती त्यावेळी मला थाळी-टाळीचे महत्व पटले, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विरोधकांना फटकारले
- तृणमूल कॉँग्रेसला केंद्राच्या सत्तेची स्वप्ने, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार, मोदी भारत चोर अशी घोषणा देणार
- पंतप्रधान किसान सन्मान योजनेत ४२ लाख अपात्र शेतकऱ्यांना तीन हजार कोटींचे वाटप, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती