वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईकर उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेने कहर केल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल? या विचारानेच मुंबईकरांना घाम फुटला आहे. Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places
सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईवर सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. मुंबईकर घामाने डबडबले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात रविवारी बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.
हवामान कसे राहणार
१४ ते १७ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे.
Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places
महत्त्वाच्या बातम्या
- फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या नवाबा तू…
- सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय
- दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक
- शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार, चित्रा वाघ यांची भावनिक साद
- एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ