• Download App
    Farmers शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

    शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय हवामान खात्याने यासंदर्भात सूचना दिल्याचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.



    विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.

    शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट मध्ये नमूद केले.

    Farmers should not rush sowing

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : ट्रम्प म्हणाले– इराणने हिजबुल्लाहला थांबवावे, अन्यथा पुन्हा हल्ला करू:अमेरिका-इराण यांच्यात 82 मिनिटे चर्चा

    MP Nagesh Patil Ashtikar : उद्धव साहेबांवर नाराज नाही; सत्तेशिवाय कामे होत नाहीत, मतदारसंघाचा विकास आणि निधीसाठी शिंदेंसोबत जातोय- नागेश पाटील आष्टीकर

    नाशिक मध्ये महायुतीत मिठाचा खडा; विजयी उमेदवार गोकूळ गीतेंवर माफी मागायची वेळ!!; पण शिवसेनेत प्रवेश करायचा ट्विस्ट!!