Fadnavis : समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे; कबुतरखानाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Fadnavis मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.Fadnavis

आरोग्याला दुर्लक्षित करता येत नाही

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे मनुष्य नसतील, वस्ती नसेल अशा जागांवर कबुतरखाने बनवण्याचा विचार करण्यात येईल. आरोग्याला दुर्लक्षित करता येत नाही. मुळात हा वादाचा मुद्दा नाहीच. परंतु, काही लोक यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकारण करत आहेत. एका समाजाच्या विरोधात दुसऱ्या समाजात तेढ निर्माण करणे, भाषेवरून वाद निर्माण करणे असे चालू आहे, पण ते यशस्वी होणार नाही.Fadnavis



उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा मांसाहारावर बंदी होती

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक जिल्ह्यात मांसाहारावर बंदीचा निर्णय महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. या प्रकरणावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे. अनेक महानगरपालिकांना मी विचारले की असा निर्णय का घेतला, त्यावेळी त्यांनी 88 चा जीआर दाखवला. अगदी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील असा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारला कोणी काय खावे हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही

सरकारला कोणी काय खावे हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही. आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत. त्यामुळे विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि त्यावर आज असे वादंग निर्माण करायचे की आमच्या सरकारने निर्णय घेतला. काही लोक इथपर्यंत पोहोचले की शाकाहारी खाणाऱ्यांना ते नपुंसक म्हणायला लागले. हा मूर्खपणा बंद केला पाहिजे. ज्याला जे खायचे तो ते खात आहे. संविधानाने प्रत्येकाला जे काही करायचे ते करण्याचा अधिकार आहे.

शरद पवार सरकारनेच कत्तलखाने बंदीचा निर्णय आणला:भाजपचा आरोप; आव्हाड, आदित्य ठाकरेंना पवारांवर टीका करण्याचा सल्ला

15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावरून भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला आहे. 15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारने घेतलेला नाही. हा निर्णय 12 मे 1988 रोजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना व काँग्रेस सत्तेत असताना घेण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली, असे भाजपने म्हटले आहे.

Fadnavis Pigeon Feed Controversy Public Health Priority

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात