सीएसएमटीवरून थेट ५ वाजून ५६ मिनिटांची टिटवाळा जलद लोकलमध्ये बसले. त्यांनी गार्ड कॅबमधून प्रवास केला.Due to traffic congestion on the roads, Jayant Patil traveled by Mumbai local
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई म्हणजे गर्दी. त्यातली त्यात मुंबईत गाडीने किंवा बसने प्रवास करायचं म्हणल की मग वेळेवर पोहचू हे विसरूनच जावं. कारण सध्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईत वेळेवर पोहचणे हे एक आव्हानच झालय.
या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच सहन करावा लागतो. याच कारणामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट मुंबई लोकलने प्रवासाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai lifeline : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवासाची मुभा ; असा मिळवा Local Offline Pass …
जयंत पाटील यांना डोंबिवलीला जायचं होतं. मात्र, गाडीने प्रवास करताना होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्यांनी सीएसएमटीवरून थेट ५ वाजून ५६ मिनिटांची टिटवाळा जलद लोकलमध्ये बसले. त्यांनी गार्ड कॅबमधून प्रवास केला. विशेष म्हणजे याआधी देखील त्यांनी अशाप्रकारे डोंबिवलीपर्यंतचा प्रवास मुंबई लोकलने केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App