• Download App
    उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी टाळण्यासाठी निर्णय|District closure in Osmanabad; Devotees have no access

    WATCH : उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचा गर्दी टाळण्यासाठी निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे. कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे.District closure in Osmanabad; Devotees have no access

    या काळात तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू आहे.पौर्णिमाला महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या ३ दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.



    पोर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमेदिवशी व पोर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे .या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यानुसार तुळजापूर शहरात व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

    • उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी; भाविकांना प्रवेश नाही
    •  कोजागिरी पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक येतात
    • गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी, जिल्हाबंदीचे आदेश
    •  तुळजापुर शहरामध्ये संचारबंदी लागू आहे
    • उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सीमाबंदी लागू केली
    • कडक पोलिस बंदोबस्त लागू केला आहे

    District closure in Osmanabad; Devotees have no access

    Related posts

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची नाशिक रोड तुरुंगात रवानगी; कोठडीतून आज ईडी ताब्यात घेणार

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; प्रशासनाच्या बरोबर काम करायची मोठी संधी

    महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना मिळणार विकासाची नवी झळाळी; भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वराचा समावेश!!