विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद : कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे. कोजागिरी पौर्णिमा काळात ३ दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे.District closure in Osmanabad; Devotees have no access
या काळात तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू आहे.पौर्णिमाला महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या ३ दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.
पोर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमेदिवशी व पोर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे .या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यानुसार तुळजापूर शहरात व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App