विशेष प्रतिनिधी
वसई : Devendra Fadnavis वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. मागील 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विधानसभेत परिवर्तन केले, तसे महापालिकेत करावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.Devendra Fadnavis
पालघर जिल्ह्यात निवडणुका जिंकल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसईत दाखल झाले. प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ, शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत, वाढवण बंदर चर्चा सभा, बांबू लागवड उपक्रम, वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटिट विस्तारित रुग्णालय, बोळींज पोलिस ठाण्याचे एसीपी, डीसीपी कार्यालयाचे ऑनलाइन प्रणाली द्वारे उद्घाटन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात स्नेहा दुबे पंडित यांच्याही जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस केले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले आहे.
नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात वसई पालघर भागात आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे. मी असेल, पालकमंत्री गणेश नाईक आम्ही सगळे पूर्ण ताकदीने स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठीशी उभे आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाच वर्षांमध्ये तुमचा गेल्या वीस वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. यानंतर कार्यकर्त्यांनी देवा भाऊ जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यावर जिंदाबाद म्हणून चालणार नाही. बॅकलॉग भरायचा असेल, तर जसे परिवर्तन विधानसभेत केले, तसे महानगरपालिकेतही करावे लागेल, असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.
महापालिकेसाठी पूर्ण ताकदीने उतरा
फडणवीस पुढे म्हणाले, तुमच्या परिवर्तनाची गुरूकिल्ली महानगरपालिकेत आहे. ती जो पर्यंत आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली, तर ती दरवाजाजवळ येऊन थांबणार आहेत, ती पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आता सर्वांनी जोरात कामाला लागा. महानगरपालिकेच्या दृष्टीने पूर्ण ताकदीने उतरा. तिथे देखील परिवर्तन घडवा. तुम्ही महानगरपालिकेत परिवर्तन घडवल्यानंतर पुढील पाच वर्षांत काय परिवर्तन होते ते बघा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडूनही तयारी
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना देखील तयारीला लागली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील सेना भवन येथे शाखा प्रमुखांची बैठक पार पडली. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या मंडळींना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागा. त्यासाठी दररोज 300 घरातील मतदारांची भेट घेण्याचे लक्ष्य ठेवावे. त्यानुसार दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे. त्यासोबतच पक्षाने केलेले काम या मतदारांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवावा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांना दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App