• Download App
    CM Fadnavis Rejects Raj Thackeray's Two-Language Stance; Backs Three-Language Policy

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज ठाकरेंचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा, देशात 3 भाषांचे सूत्र

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :CM Fadnavis   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.CM Fadnavis

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते आज बुधवारी पिंपरी चिंचवड येथील संतपीठाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप जोरकसपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा असू नये. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरात 3 भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडूने 3 भाषांच्या सूत्राला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिले. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.



    एनईपी केंद्राने एकट्याने तयार केली नाही

    ते पुढे म्हणाले, आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत असताना आपली मुले दुसरी एखादी भाषा अजून शिकत असतील, तर त्या भाषेतील ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषेचा आग्रह चुकीचा आहे. एनईपी केंद्र सरकारने एकट्याने तयार केली नाही. देशभरातील तज्ज्ञांनी मिळून ती तयार केली. ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, आदी बाबींचा सखोल विचार करण्यात आला. हे धोरण तयार करताना 3 वर्षे चर्चा झाली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर 3 भाषेचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

    तिसरी भाषा हिंदी म्हणूनची अनिवार्यता काढली

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी भाषा आपण यापूर्वी अनिवार्य केली होती. पण काल काढलेल्या जीआरद्वारे ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. आता आपण असे म्हटले आहे की, कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेच्या सूत्राचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यात मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याशिवाय दोन भाषा व त्यातील एक भारतीय भाषा असावी असे हे सूत्र आहे. यापैकी एक भाषा म्हणून लोक इंग्रजीला प्राधान्य देतात. त्यानंतर कुठलीही एक भारतीय भाषा म्हणून हिंदी म्हटले होते. कारण, आपल्याकडे हिंदीचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्यासाठी 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देता येईल. ऑनलाईन पद्धतीनेही ट्रेनिंग दिले जाईल.

    भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही

    आपण सर्वजण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. भारतीय भाषा इंग्रजीहून चांगल्या आहेत. इंग्रजी ही व्यवहार्य भाषा झाली आहे हे ठीक आहे. पण नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता आपण इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीत शिकवायला लागलो. यापूर्वी असे होत नव्हते. वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षणही मराठीत दिले जात आहे. एमबीएही मराठीत शिकवले जात आहे. म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला वैश्विक भाषा, ज्ञान भाषा व अर्थकारणाची भाषा बनण्याचे दालन उघडे झाले आहे. महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वाद योग्य नसल्याचे मला वाटते, असे फडणवीस म्हणाले.

    बडगुजरांनी भाजपच्या नियमाने वागावे

    फडणवीस यांनी यावेळी भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षाच्या नियमानुसार वागण्याचाही सल्ला दिला. सुधाकर बडगुजर यांच्यावर आमच्या नेत्यांनी टीका केली होती हे खरे आहे. नीतेश राणे यांनी यासंबंधी एक व्हिडिओ रीलिज केला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या चौकशीनंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे सर्वकाही विधानसभा निवडणुकीपूर्वी घडले आहे. कुणी पक्षात येत असेल तर आपण निश्चितपणे त्यांचे स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की, त्यांचा जुना इतिहास काय असेल? वागण्याची पद्धत काय असेल? ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती-नियमांनी वागले पाहिजे, असे ते म्हणाले.

    CM Fadnavis Rejects Raj Thackeray’s Two-Language Stance; Backs Three-Language Policy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Nirupam : मुंबईत ‘हाऊसिंग जिहाद’चा कट, २२० फ्लॅट्स बेकायदेशीरपणे विकले – संजय निरुपम

    Aghori puja : महायुतीतील संघर्ष तीव्र; सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा व्हिडिओ केला पोस्ट

    Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांसाठी भाजप मधला प्रवेश सुकर, पण शिस्तीच्या पक्षात पुढची वाटचाल खडतर!!