वृत्तसंस्था
गुवाहाटी : मुख्यमंत्री महोदय, तुमचे फेसबुक लाईव्ह फारच भावनिक होते. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरे कुठे दिलीत?, असा परखड सवाल करत एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Chief Minister, where are your Facebook Live emotional, but answers to the basic questions
महाराष्ट्राच्या राजकारणात जो सत्ता नाट्याचा थरार सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना एक खरमरीत पत्र लिहून, आमदारांना मागच्या अडीच वर्षांत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. अडीच वर्षे आमच्यासाठी वर्षा बंगल्याची ची दारे बंद होती. अनेकदा तासनतास आम्हाला वर्षाच्या गेटवर वाट बघायला लागली, असा आरोप शिरसाट यांनी पत्राद्वारे केला आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
हिंदुत्व, अयोध्या, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले?? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमातळावरुन निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहका-यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करुन सांगितले की, आमदारांना अयोध्येत जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर अविश्वास का दाखवलात?? असा प्रश्न शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App