चंद्रकांत पाटील म्हणाले की ,” कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? Chief Minister Uddhav Thackeray got 5th place among the top chief ministers of the country, Chandrakant Patil gave a response
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने एक सर्व्हे केला आहे.दरम्यान सर्व्हेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये पाचवे स्थान मिळालं आहे.दरम्यान हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की ,” कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत.ते लोकांसठी गेल्या 80-90 दिवसांपासून उपलब्ध नाहीत.”
पुढे पाटील म्हणले की , पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री आजारपणाच कारण सांगूनउपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र म्हणजे फक्त आणि फक्त मुंबई आहे. मग मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App