• Download App
    Bulldozers will be used against those who transport cows illegally in Maharashtra; Transport Minister Pratap Sarnaik warns महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

    महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

    Pratap Sarnaik

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गो तस्करी आणि जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गायांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाईसह कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पत्रक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केले.Bulldozers will be used against those who transport cows illegally in Maharashtra; Transport Minister Pratap Sarnaik warns

    महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपास मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मे ते २८ मे दरम्यान विभागीय परिवहन अधिकारी, उपविभागीय परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि वाहतूक यंत्रणेला युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. हिंदू समाजासाठी गाय ही श्रद्धा आणि संस्कृतीचा विषय असल्याने तिची हत्या किंवा अवैध वाहतूक सहन केली जाणार नाही, अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली.



    – वाहने जप्त होणार

    राज्यात गो तस्करीचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनावरांना उपाशी ठेवणे, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये कोंबून नेणे आणि अवैध कत्तलखान्यांकडे पुरवठा करणे, असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे गाईंची अवैध वाहतूक करणाऱ्या दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसून त्यांची वाहने कायमची जप्त केली जाणार आहेत.

    Bulldozers will be used against those who transport cows illegally in Maharashtra; Transport Minister Pratap Sarnaik warns

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्र शासन आणि ॲग्रेको इंडिया कंपनीचा सामंजस्य करार; ४०० कोटींची गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती!!

    महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची नुसतीच चर्चा; प्रत्यक्षात तामिळनाडूत झाले ऑपरेशन शिट्टी!!

    Dattatray Bharne : राज्यात इंधनसाठा मुबलक; अफवांवर विश्वास ठेवू नका, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन