विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bhaskar Jadhav उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सर्व्हे आहे, त्यामुळे भाजप घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.Bhaskar Jadhav
शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण, विरोधी पक्षांच्या आमदार, खासदाराबद्दल अफवा पसरवणे आणि भाजपबद्दल लोकांचे प्रेम वाढल्याचा आभास निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्यास नवल नाही. सर्व जाती, धर्माच्या लोकांना चुचकारायचे. पण, प्रचार मात्र भाजपचा करायचा असा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात आला आहे. पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकरिता पाहिजे होता. आता ते तीन झालेले आहे. पण भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.
नागपूर महानगरपालिकेत आमच्या ताकदीचा आम्हाला अंदाज आहे. हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. यापूर्वी आम्हाला योग्य संधी मिळाली नाही. आमच्या पक्षातील कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहे. योग्य संधी मिळाली की ते करिष्मा करून दाखवतील. सहा महिन्यापूर्वी १५१ जागेचा आढावा घेतला आहे. वस्तुस्थिती समजून घेऊन निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App