नाशिक : महाराष्ट्रात बच्चू कडूंनी उपोषण आंदोलन केल्यानंतर सगळ्या विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा धोषा लावला. बच्चू कडू उपोषण करेपर्यंत त्याविषयी कोणी बोलले नव्हते, पण आता सगळेच नेते त्यावर बोलायला लागलेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना political timing शिकवायचा प्रयत्न केला. तुम्ही निवडणुकीची वाट पाहत बसू नका. हा शेतकरी अडचणीत असतानाच त्याला कर्जमाफी देऊन मोकळे व्हा, असे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते नकारात्मक भूमिका घेत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेते सकारात्मक भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वेळी अजित पवारांना राज्याची आर्थिक शिस्त आठवली. त्यामुळे स्वतः अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफी वर नकारात्मक सूर लावला. कर्जमाफीच्या बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पसरल्या, तर शेतकरी कर्जाचे हप्ते फेडणारच नाहीत. ते कर्जमाफीची वाट पाहत राहतील. बँकांना कर्जवसुली करता येणार नाही. त्यामुळे राज्यामधल्या सहकारी बँका अडचणीत येतील. त्याचा दुष्परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक भांडवलीकरणावर होईल, याची भीती अजितदादांच्या राष्ट्रवादीला वाटली.
पण दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही योग्य वेळी करू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला. फडणवीस यांनी सांगितलेली “योग्य वेळ” कोणती यावर बराच खल सुरू झाला. जिल्हा परिषद निवडणूक जाहीर व्हायच्या आधी फडणवीस कर्जमाफीची घोषणा करणार अशी अटकळ सगळ्याच राजकीय पक्षांनी बांधली. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना political timing साधायचे शिकवले. निवडणूका जाहीर व्हायची तुम्ही वाट पाहू नका. त्या आधीच कर्जमाफी करा, असे अनिल देशमुख म्हणाले.
2019 नंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमधून ज्या देवेंद्र फडणवीसांनी बरेच धडे शिकले आणि त्यानंतर proper political timing साधून अनिल देशमुख यांच्या नेत्यावर मात करून दाखवली, त्या फडणवीसांना अनिल देशमुख यांनी political timing शिकवायचा प्रयत्न केला. याची राजकीय वर्तुळात खिल्ली उडवली जात आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये गृहमंत्री पदासारखे मोठे पद भोगून सुद्धा अनिल देशमुख proper political timing साधू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या राजकीय आरोपांमध्ये गुंतवून त्यांना अटक करायचा डाव ठाकरे + पवारांनी आखला होता. तो डाव अनिल देशमुख यशस्वी करू शकले नाहीत. सचिन वाझे प्रकरणात स्वतःची अटक देखील ते टाळू शकले नाहीत, ते अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीच्या निमित्ताने political timing कसे याचा धडा शिकवू लागले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेकांना हसू फुटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App