विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manikrao Kokate आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.Manikrao Kokate
नेहमी वादग्रस्त विधानं करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान करुन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ… pic.twitter.com/R1ZgHdTme9 — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 30, 2025
नेहमी वादग्रस्त विधानं करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान करुन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ… pic.twitter.com/R1ZgHdTme9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 30, 2025
राज्य सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वारंवार वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. यातच आता अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना डिवचणारे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर शेत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. केवळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतील. काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे होणार नाहीत. शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू – रोहित पवार
रोहित पवारांनी कृषिमंत्र्यांच्या या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, नेहमी वादग्रस्त विधानं करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान करुन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे कृषिमंत्री महाशय करत आहेत.
राज्यभरात मे महिन्यात झालेल्या पावसाने ४० हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून सर्वाधिक फटका हा कांदा, फळबाग आणि भाजीपाला पिकांना बसला. कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच तब्बल ७ हजार हेक्टरपर्यंत नुकसान झालं असून हे कृषिमंत्र्यांनी बांधावर जाऊन बघावं. नुकसानीचे पंचनामे करताना जुने निकष काही असले तरी पावसामुळं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना द्यायची नाही का? मा. अजितदादा आपणच यामध्ये लक्ष घालण्याची आणि कायमच वादग्रस्त बोलणाऱ्या या मंत्र्याला संवेदनशीलतेने बोलण्याचा धडा देण्याची गरज आहे.
वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी
कोकाटे यांनी पिक विमा योजनेबद्दल बोलताना म्हटले होते की, “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो.” या विधानामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि त्यांनी कोकाटे यांच्यावर टीका केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App