प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच आता, शनिवारी रात्री राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही अशीच घटना घडली.
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी बँकेचे महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध १२२ कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहार प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (EOW) केली जाईल.
जगातल्या काही विशिष्ट उदाहरणांवरून सगळी जागतिक लोकशाहीच धोक्यात आल्याच्या बाता मारणाऱ्या युरोपला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खडे बोल सुनावले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमधील नऊ ठिकाणी आणि हरियाणातील हिसारमधील दोन ठिकाणी छापे टाकले. सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपासाअंतर्गत सीबीआयने ही छापेमारी केली आहे.
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. तर टीम इंडिया आपले सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळणार आहे. दरम्यान, शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुबईला रवाना झाली आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर, भाजप आता दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) देखील सरकार स्थापन करू शकते. शनिवारी आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज आपल्या घराच्या प्रांगणातच चायनामेड ड्रोनशी खेळले. त्यांनी त्यातले तंत्रज्ञान भारतीयांना “शिकवले.
महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या कायद्याद्वारे लोक लव्ह जिहादच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांपासून वाचतील असा राज्य सरकारचा विश्वास आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी सरकारचे हे पाऊल स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे म्हटले.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या सर्वोच्च संघटनेत पहिला मोठा फेरबदल करताना, काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
मध्य प्रदेश सरकारने राज्यातील १९ पवित्र ठिकाणी दारूबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. १ एप्रिलपासून या भागातील दारूची दुकाने बंद राहतील. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे दहशतवाद आणि खोऱ्यातील दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांनी तीन सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाकुंभमेळ्याचा आज ३४ वा दिवस आहे. यावेळी महाकुंभात अनेक नवीन विक्रम झाले आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. यानंतर महाकुंभात आणखी एक विक्रम झाला आहे. जगभरातून लाखो भाविक महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभात ६० कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रामध्ये love jihad विरोधातला कायदा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने नुसती समिती स्थापन केली, तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी त्यावर लगेच आगपाखड केली.
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचा वाद वाढत चालला आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत इंडियाज गॉट लेटेंटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुरावर चर्चा झाली.
संसदेत सादर केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालात असे दिसून आले आहे की देशातील राष्ट्रीय महत्त्वाची सुमारे 280 स्मारके वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्मारके राजधानी दिल्लीत आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार जाऊन नवे भाजपचे सरकार येण्यापूर्वीच केजरीवाल अडचणीत आले त्यांनी बांधलेला शीश महल (CVC) Central vigilance commission अर्थात केंद्रीय दक्षता समितीच्या चौकशीत अडकला.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये दोन उड्डाणपुलांचे उद्घाटन केले. पहिला- मुन्शी पुलिया. दुसरा- खुर्रम नगर उड्डाणपूल. उड्डाणपुलांमुळे १५ लाख लोकांना वाहतूक कोंडीतून आराम मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अटकेवरील स्थगिती 17 मार्चपर्यंत वाढवली. 15 जानेवारी रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली होती.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर, मैतेई समुदाय त्याविरुद्ध निषेध करत आहे. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर एखाद्या सक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवायला हवे होते, असे समुदायाचे म्हणणे आहे. तर कुकी समुदाय केंद्र सरकारच्या या पावलाला आशेचा किरण म्हणत आहे.
नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांच्या निवडीसाठी 17 फेब्रुवारी रोजी बैठक होऊ शकते. सीईसी निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांचा समावेश आहे. समितीच्या शिफारशीच्या आधारे, राष्ट्रपती पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामधील पाचव्या फेरीची बैठक शुक्रवारी (14 फेब्रुवारी) चंदीगड येथे झाली. या बैठकीला 28 शेतकरी नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात आप नेते सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्यासाठी राष्ट्रपतींकडे परवानगी मागितली आहे. दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री जैन यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम २१८ अंतर्गत मंजुरीची मागणी करण्यात आली आहे.
आज म्हणजेच १४ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी सोन्याने आपला नवीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ३४१ रुपयांनी वाढून ८६,०८९ रुपये झाली आहे. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव ८५,७४८ रुपयांवर होता. ११ फेब्रुवारी रोजी त्याने ८५,९०३ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला.
जवळपास तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रशियाच्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून दावा केला आहे की रशियाने त्यांच्या चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला आहे आणि त्यांनी या हल्ल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App