बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरात ६० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, चंदीगड, पुणे, कोल्हापूरसह अनेक राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. या कारवाईचा उद्देश बिटकॉइनच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांना पकडणे आहे.
दिल्ली विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मद्य धोरणाशी संबंधित कॅग अहवाल सादर केला. १४ कॅग अहवालांपैकी पहिला कॅग अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला आहे. कॅगच्या अहवालात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या अहवालानुसार, आम आदमी पक्षाच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे दिल्ली सरकारला सुमारे २,००२.६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नोकरीसाठी जमीन घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात दाखल केलेल्या अंतिम आरोपपत्राची दखल घेतली आणि मंगळवारी समन्स जारी केले. न्यायालयाने लालू यादव यांच्या मुला-मुलीसह सर्व आरोपींना समन्स पाठवले आहेत.
अस्थिर वातावरण आणि रुपयातील कमकुवतपणा दरम्यान, रिझर्व्ह बँकेने जानेवारीमध्ये २.८ टन सोने खरेदी केले. गेल्या वर्षीही आरबीआयने ७२.६ टन सोने खरेदी केले होते. यामुळे, मध्यवर्ती बँकेच्या एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा ११.३% पर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षी ७.७% होता.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात एक नवा विक्रम रचण्यात आला आहे. यंदा महाकुंभाच्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमासोबत, स्वच्छतेचे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड देखील बनवले जात आहेत.
एकीकडे पूर्वेकडच्या आसाम आणि दक्षिणेतले केरळ राज्यांमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा तिथल्या राज्य सरकारांनी आणि देशातल्या बड्या उद्योगपतींनी बाळगली असताना प्रगत महाराष्ट्रात मात्र जात वर्चस्वाचा राजकारणाने धुमाकूळ घातला आहे.
जर्मनीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दक्षिणपंथी पक्ष क्रिश्चियन डेमोक्रॅटिक युनियन (CDU) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्त्ज देशाचे नवीन चांसलर बनू शकतात. या पार्श्वभूमीवर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या नेत्याबद्दल..
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री संप्रदायाचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत. श्री संप्रदायाच्या वतीने आज राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे.
हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. यावेळी शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊ नये असा इशारा दिला आहे. त्यांना योग्य मोबदला द्या. सध्या आमचे लक्ष केंद्राकडे आहे. जर कोणत्याही जिल्ह्यात जबरदस्तीने जमीन संपादित केली गेली तर आम्ही पंजाब सरकारचे जगणे कठीण करू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ते गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियमवर पोहोचले. ते म्हणाले, ‘एक काळ असा होता जेव्हा देशात आसाम आणि ईशान्येकडील विकासाकडे दुर्लक्ष केले जात असे. येथील संस्कृतीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. पण मोदी स्वतः ईशान्येकडील संस्कृतीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत.
अदानी ग्रुप मध्य प्रदेशात २.१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भोपाळ येथे होत असलेल्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी याची घोषणा केली आहे. समूह कंपन्या खाणकाम, स्मार्ट वाहने आणि औष्णिक ऊर्जा क्षेत्रात १.१० लाख कोटी रुपये गुंतवणूक करतील.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते मंडी येथील आयआयटी कामंद येथे १६ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासात तांत्रिक नवोपक्रमाचे महत्त्व यावर आपले विचार व्यक्त केले.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मुंबई , नवी मुंबई, पुण्यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंगळवारी (25 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
‘शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय’ असंही मुख्यमंत्री फडणवी यांनी सांगतले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे.
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. कॉक्स बाजार एअरबेसवर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारमधील भागलपूर येथून किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता जारी केला.
Kisan Samman Nidhi
शेख हसीना देश सोडून गेल्यापासून आणि मुहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्याचवेळी, बांगलादेशचे अंतरिम सरकार भारताशी संबंध आणखी बिघडवण्यात कोणतीही कसर सोडताना दिसत नाही.
पंजाब विधानसभेचे अधिवेशन आता लवकरच सुरू होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले की, आम आदमी पक्षाचे ३२ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत.
माजी मुख्यमंत्री आतिशी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील. रविवारी झालेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. अरविंद केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे सर्व 22 आमदार बैठकीला उपस्थित होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी सांगितले की, संविधानात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि इतर कोणालाही नाही. न्यायपालिकेलाही नाही. जर कोणतीही व्याख्या करायची असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यावर आपले मत देऊ शकते. राज्य विधिमंडळांना काही बाबींमध्ये संविधान बदलण्याचा अधिकार आहे.
केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमधील त्रिभाषिक युद्ध सुरूच आहे. रविवारी, द्रमुक कार्यकर्त्यांनी कोइम्बतूरमधील पोल्लाची रेल्वे स्थानकाच्या बोर्डवरील स्टेशनचे हिंदी नाव काळ्या रंगाने पुसून टाकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धाममध्ये म्हणाले- धर्माची खिल्ली उडवणाऱ्या नेत्यांचा एक गट आहे. ते आपल्या सण आणि परंपरांना नावे ठेवतात. हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे लोक शतकानुशतके कोणत्या ना कोणत्या वेशात जगत आहेत. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ले करत राहतात. परदेशी शक्ती देखील या लोकांना पाठिंबा देते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App