मंदिरं ही सगळ्यांची श्रद्धेची स्थानं तर आहेतच. पण, ती पुरातन काळी जशी सामाजिक समतेची केंद्र होती, तशीच ती पुन्हा व्हावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
राजधानी दिल्लीनंतर आता बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची बातमी आहे. सोमवारी सकाळी बिहारमधील सिवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता दिल्लीतील भूकंपाइतकीच म्हणजेच ४.० इतकी नोंदवली गेली. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले आणि बराच वेळ मोकळ्या जागेवर उभा राहिले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी नोंदवली गेली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारच्या “लव्ह जिहाद” रोखण्यासाठी कायदा तयार करण्याच्या निर्णयाला विरोध केला. महाराष्ट्र सरकारने एक शासकीय ठराव जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की पोलिस महासंचालक (डीजीपी) यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती “लव्ह जिहाद” आणि सक्तीने धर्मांतर करण्याच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना सुचवेल. ही समिती इतर राज्यांमध्ये बनवलेल्या कायदेशीर बाबी आणि कायद्यांचाही विचार करेल आणि अशा घटना रोखण्यासाठी कायदे करण्याची शिफारस करेल.
१२२ कोटी रुपयांच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात, आर्थिक गुन्हे शाखेने डेव्हलपरला अटक केली असून त्याचे नाव धर्मेश पौण असल्याचे सांगितले जात आहे.
गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषीला कठोर शिक्षा सुनावली आहे. आयर्लंड-ब्रिटिश नागरिक असलेल्या महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी विकट भगतला सोमवारी दोषी ठरवण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्या पत्नीशी संबंधित वादावर कायदेशीर कारवाई करण्याच्या योजनेचे स्वागत केले. हिमंता यांनी रविवारी सांगितले की, राज्य सरकार कायदेशीर कारवाई देखील सुरू करत आहे.
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? सर्वांच्या नजरा यावर खिळल्या आहेत. दरम्यान, प्रथम विधिमंडळ पक्षाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे समोर आले आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ होणार आहे. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीए शासित
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची तिसरी तुकडी आज (16 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता अमृतसर विमानतळावर उतरली. अमेरिकन हवाई दलाच्या C-17A ग्लोबमास्टर विमानात 112 लोक असल्याची माहिती आहे. विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी निर्वासितांची चौकशी करतील. त्यांना बाहेर येण्यासाठी 3 ते 4 तास लागू शकतात.
दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर लोक प्रचंड घाबरले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने पुन्हा एकदा दिल्लीत भूकंपाचे ‘आफ्टरशॉक’ म्हणजेच सौम्य धक्क्यांचा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी कोलकात्यातील बर्दवान येथे स्वयंसेवकांना संबोधित केले. त्यांनी हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भागवत म्हणाले की, ‘संघ संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करू इच्छितो. आपल्याला हिंदू समाजाला एकत्र करण्याची गरज का आहे? कारण या देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू समाज आहे.
“इंडियाज गॉट लेटंट” शो मध्ये आई-वडिलांसंदर्भात अश्लील शेरेबाजी केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत युट्युबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखिजा, जसप्रीत सिंग आशिष चनचलानी, तुषार पुजारी, सौरभ बोथरा आणि बलराज घई या सर्वांना सुनावणीसाठी आज तारीख 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
सोमवारी सकाळी 5:36 मिनिटांनी राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजण्यात आली. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.
पंतप्रधान मोदींच्या जातीबद्दलच्या विधानाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर भाजप आमदार टी राजा सिंह यांनी शनिवारी टीका केली. ते म्हणाले- “रेवंत रेड्डी एका कोंडीत अडकले आहेत. ते फक्त तेच बोलतात जे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांना पाठवतात.
राहुल गांधी राजधानीतल्या आपल्या घराच्या अंगणात चिनी ड्रोनशी खेळले, त्यानंतर चीनला शत्रू मानूच नका, असे राहुल प्रिय सॅम पित्रोदा बरळले!!
चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. पाटणामध्ये सुशांतचे वडील केके सिंह यांनी पुन्हा एकदा न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये आढळला.
महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये अजूनही मोठी गर्दी जमत आहे, गर्दी पाहता प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन आता २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे.
चित्रपट निर्माती एकता कपूरवर भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप आहे. यूट्यूबर विकास पाठक उर्फ ’हिंदुस्तानी भाऊ’ यांनी एकता कपूर, तिचे वडील जितेंद्र, आई शोभा आणि एकताच्या ओटीटी प्लॅटफॉर्म एएलटी बालाजीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन लष्करी विमाने येत आहेत. रविवारी देखील, ११२ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन एक अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर पोहोचले.
‘भारत टेक्स 2025’ मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 14 फेब्रुवारी) भारत मंडपम येथे पोहोचले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण जगातील सहाव्या क्रमांकाचे कापड आणि वस्त्र निर्यातदार आहोत. आपली कापड निर्यात 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2030 पर्यंत ते 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा १८२ कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DOGE) शनिवारी हा निर्णय घेतला.
दिल्लीत आज (सोमवार) होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभही १८ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. असल्याची माहिती समोर आली आहे.
लालू प्रसाद यादव यांनी ज्या कुंभमेळ्याची संभावना “फालतू या शब्दांनी केली, त्याच कुंभमेळ्यात जाऊन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्रिवेणी संगमात स्नान करणार आहेत. त्यामुळे Indi आघाडीतले मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
छत्तीसगडमधील 173 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने सर्व 10 महानगरपालिकांमध्ये महापौर पदे जिंकली आहेत, 35 नगर परिषदांमध्ये आणि 81 नगर पंचायतींमध्ये अध्यक्षपदे मिळवली आहेत.
उत्तर प्रदेशात एक भीषण रस्ते अपघात घडला आहे. रविवारी सकाळी अयोध्येला जाणारी एक मिनी बस एका बिघडलेल्या बसला जोरदार धडकली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर ही घटना घडली.
जयललिता यांच्या मालमत्तेबाबत बंगळुरूमधील विशेष सीबीआय न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची सर्व जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडू सरकारला हस्तांतरित करण्याचे आदेश बुधवारी सीबीआय न्यायालयाने दिले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App