महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑपरेशन सिंदूर आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्राला अशांत करण्याचे सतत प्रयत्न झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकामाला लागणारी वाळू उपलब्ध होण्यास सुविधा होईल. तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही राज्य सरकारच्या वतीने स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे अर्थ व ऊर्जा मंत्री कनुभाई देसाई यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषद (पश्चिम क्षेत्र)’ संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील नागरी क्षेत्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांच्या नव्या नियुक्त्या आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि’. आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण’ परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा पत्र लिहून केली. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने त्या मागणीत खोडा घातला. संरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती संसदेच्या विशेष अधिवेशनात करण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठकीत चांगली होऊ शकते, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, सिंधुदुर्ग येथे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’चे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)’ कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळ, मध्य प्रदेश येथे ‘संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महाराष्ट्र – मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक’ पार पडली.
मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे होता. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – ‘ॲक्वा लाइन टप्पा 1 सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
मुंबईतील भारतातील आघाडीचे कर्करोग उपचार केंद्र असलेल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला शुक्रवारी सकाळी एक धमकीचा ईमेल मिळाला, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की रुग्णालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो उडवून दिला जाईल. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उद्घाटन करत उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र शासन आणि विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश उद्योग व्यवसाय सुलभ करणे आणि नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीचे बनवणे हा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’शी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत बैठक पार पडली. यावेळी नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्पांना तत्वतः मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र शासनाची 16व्या वित्त आयोगा’समवेत बैठक संपन्न झाली. यावेळी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे तसेच देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीत राज्याच्या मोलाच्या सहभागाचे कौतुक केले.
देशात सगळीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरची आणि भारत – पाकिस्तान यांच्यातल्या तणावाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “चव्हाण + रेड्डी काँग्रेस” करून टाकली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा’ कार्यक्रम येथे 100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती’ या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.
भारतीय सैन्य दलांनी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बदला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि ठोस कारवाई करत
मॉक ड्रिल दरम्यान, युद्धकाळातील परिस्थितींचा सराव केला जाईल. विशेष प्रतिनिधी मुंबई : युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App