सोने आणि चांदीच्या किमती आज म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅम १,०२९ रुपयांनी वाढून १,१०,५४० रुपयांवर पोहोचले आहे.
विशेष प्रतिनिधी धाराशिव : Pratap Sarnaik : सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली कला केंद्रांमध्ये अवैध व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास अशा केंद्रांचे परवाने तातडीने […]
विशेष प्रतिनिधी बीड : Beed railways : उद्या, 17 सप्टेंबर 2025, हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत असल्याची तिखट टीका भाजपने केली आहे. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत आहेत. पण इतिहासात डोकावले, तर त्यांच्या सत्तेच्या काळात आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आत्मे त्यांना प्रश्न विचारताना दिसतील, असे भाजपने म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार न्याय मिळत असेल, तर आमच्या बंजारा समाजालाही एसटीचे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विचार करावा लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंजारा व बंजारा एकच असल्याचा दावाही केला. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हणत हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राज्य सरकारने मंजूरी दिल्यानंतर इतर समाजाने विरोध करत हैदराबाद गॅझेट प्रमाणे आम्हालाही या प्रवर्गात घेऊन आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण दिले जाणार आहे, परंतु या गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा आहे, त्यामुळे आता बंजारा समाज देखील आक्रमक झाला आहे, आमचा समावेश हा आदिवासींमध्ये अर्थात एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी या समाजाची आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाजामधून मात्र या मागणीला जोरदार विरोध होत आहे.
विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना लाभ देण्यासाठी आजच्या बैठकीत फडणवीस मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
विशेष प्रतिनिधी ठाणे : Parashuram Economic Development Corporation : राज्य मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची भर पडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हे वाढीव मंत्रिपद […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागतच नाही, असे दिसत आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता लवकरच निवडणुका होतील, […]
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांची संख्या 1356 वरून 2399 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा “नेपाळ” करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??, असे विचारायची वेळ खुद्द शरद पवारांच्याच इशाऱ्यामुळे आली आहे.
मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि कर्जमाफीचा, पण शरद पवारांचा राष्ट्रवादी “स्वप्न” पाहते आहे, महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा!!, हे राजकीय सत्य आज खुद्द शरद पवारांच्या तोंडूनच बाहेर पडले.
विशेष प्रतिनिधी बीड : Ajit Pawar : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले आहे. […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : Sharad Pawar : नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे […]
साहेब खडे तो सरकारसे बडे, एकाच दिवसात पवारांच्या घोषणेला हरताळ फासे!!, असं म्हणायचे वेळ नाशिक मधल्या असं म्हणायची वेळ नाशिक मधल्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चामुळे आली.
विशेष प्रतिनिधी नाशिक : Kumbh Mela in Nashik : पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या या कुंभमेळ्याला […]
विशेष प्रतिनिधी जालना: Manoj Jarange : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. […]
भारत–पाक सामन्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा. राष्ट्रवाद दाखवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये ती हिंमत नाही. ते स्वतःच्या लोकांवर बोट ठेवणार नाहीत आणि ढोंगी आंदोलन करणार आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे,” असेही शरद पवार म्हणालेत.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.
महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे असे सांगतानाच हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींमुळे बंजारा समाजासारख्या इतर समाजांनाही आदिवासीत सामील होण्याची मागणी करण्यास प्रोत्साहन मिळाले असल्याचे सांगून त्यांना उचकविण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केली आहे.
“साहेबांचा पक्ष” ही प्रतिमा पुसण्याचा शरद पवारांच्या भाषणातून प्रयत्न; पठडीबाज मराठा राजकारणातून बाहेर पडायचा यत्न!!,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नाशिक मधल्या शिबिरात राहुल गांधींचा चालला अजेंडा; सफरचंद + कलिंगड + केळी निवडणूक चिन्हे वापरून मतं चोरीचा डेमो दिला. शरद पवारांच्या समोर व्यासपीठावर हे आज घडून आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App