वृत्तसंस्था
मुंबई : ”बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे – पवार सरकारवर केली. Bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government over recruitment
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ठाकरे सरकारवर पदभरती मुद्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरला जीव गमवावा लागला होता. त्यांनतर सरकारने ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली.
आतातर वेगवेगळ्या २० विभागात ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, लोकसेवा आयोगाकडं केवळ ४ हजार २६४ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी केली आहे. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात विविध श्रेणीतील २५०० च्या आसपास पदं रिक्त होती. मात्र अमित देशमुख यांनीपद भरतीची मागणी सरकारकडे केली नाही. हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे.प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही, असे पडळकर म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App