देवेंद्र फडणवीसांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे विलीनीकरण पुढे रेटू शकतील??
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा double game खेळली. सुनेत्रा पवारांना संधी दिली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.
यशवंत शिष्याची काय ही अवस्था??, सुनेच्या पक्षात सुद्धा विलीन होत येईना!!, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुराळा उडाला. आता दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही आणि झाले तर ते आपल्या अटी शर्तींवर होत नाही, हे लक्षात येताच आम्ही काय शस्त्र टाकून शरणागती पत्करायला जात नव्हतो, असा राणा भीमदेवी थाट पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आणला. जयंत पाटलांनी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्याला वेगळ्या शब्दांनी दुजोरा दिला, पण दोघांनीही अजित पवारांची शपथ वाहून विलीनीकरण करण्याचा आग्रह अजित पवारांचाच होता, असा वारंवार दावा केला
सुनेत्रा पवार यांच्या निर्णयातून शरद पवार “नॉन प्लस” झाले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचा निर्णय झाला तो त्यांनी स्वीकारला.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो निर्णय घेण्यात आला तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही, असे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!
अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.
विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने; पण अजितदादांनी त्याचे श्रेय दिले शरद पवारांना!!, असे आज लातूरमध्ये घडले.
शरद पवारांच्या कोलांट उड्यांचे गौतम अदानींच्या डोक्यावर खापर; “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड!!, हेच राजकीय चित्र या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दिसले. शरद पवार गौतम अदानींना फक्त 25 कोटी रुपयांमध्ये “पटले”, हे काही पवार बुद्धीच्या पत्रकारांना पटले नाही. गौतम अदानींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्या देणगीतून “शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स” उभे राहिले आणि त्याच्या उद्घाटनाला पवारांनी गौतम अदानींना बोलावले.
गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून, ते माझ्या हक्काच्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे स्वागत करताना त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष आघाडी करण्याची शक्यता बळावली असतानाच मराठी माध्यमांनी शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा करत आहेत, अशा दावा करणाऱ्या बातम्या दिल्या त्यासाठी वेगवेगळी आणि भली मोठी कारणे सुद्धा दिली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
एपिस्टाईन फाईल मधून जे धक्कादायक खुलासे झाले, त्यातून मराठी माणसाला पंतप्रधान बनायची संधी आहे, असे मी म्हटले होते. पण ते 19 डिसेंबरलाच होईल, असे मी म्हटले नव्हते. शिवाय जे पंतप्रधान होतील, ते नागपूरातले असतील. बारामती किंवा कराड मधले पंतप्रधान होणार नाहीत, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला टोचले. पण त्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज बाबांनी शरद पवारांच्या जुन्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.
शरद पवारांनी जे आयुष्यभर पुढचे मागचे खालचे वरचे राजकारण केले, त्याची फलश्रुती पवारांच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्यांमध्येच दिसून आली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट झाली, तर पुण्यामध्ये काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा त्यांना काँग्रेसची गरज निर्माण झाली.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पवार कुटुंब जातीयवादी आहे. त्यांना दलित, मुस्लिम, ओबीसी व आदिवासी समाज चालत नाही. त्यांनीच छगन भुजबळांना तुरुंगात पाठवले. त्यांची धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती, असे ते म्हणालेत.
पुण्याच्या लवासा सिटी प्रकल्पाला दिलेल्या कथित अवैध परवानग्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्याच वेळी, ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखाड यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. दिवाणी अधिकार क्षेत्राचा वापर करताना न्यायालय पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकते, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांना दाखवता आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती या वेळी खंडपीठाने दिली.
शरद पवारांच्या घरच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी काल रात्री सामील झाले. 86 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांनी आपली सर्वपक्षीय मैत्री प्रतिमा निर्मिती केली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही. त्याऐवजी पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येऊनच निवडणूका लढवायच्या या धोरणाला शरद पवारांनी मान्यता दिली, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिला.